शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

तत्कालीन बांधकाम मंत्र्यांच्या निकटवर्तीयांनाच कामे दिल्याने रस्त्यांची दुरावस्था; कपिल पाटील यांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 00:23 IST

यावेळी सत्तेत असलेल्या तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या निकटवर्तीयांनी भिवंडीतील बीओटी रस्त्यांची कामे घेतली असल्यामुळेच ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून सध्या या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

भिवंडी- भिवंडीत पाच टोल नाके असून शहराच्या लगत सर्वच रस्ते बीओटी तत्त्वावर देण्यात आलेले आहेत मात्र या सर्वच टोल रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. भिवंडीतील कशेळी अंजुरफाटा वडपा रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष जावे व रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर व्हावी यासाठी कशेळी टोल नाक्यावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. 

यावेळी सत्तेत असलेल्या तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्या निकटवर्तीयांनी भिवंडीतील बीओटी रस्त्यांची कामे घेतली असल्यामुळेच ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून सध्या या रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

ठाणे भिवंडी वडपे या बीओटीच्या माध्यमातून विकसित केलेल्या राज्यमार्गावरील खड्डे हे मरणयातना भोगायला लावणारे असल्याचे वक्तव्य देखील यावेळी मंत्री पाटील यांनी केले. या रास्तारोको आंदोलनप्रसंगी माजी आमदार योगेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, सपना भोईर, पं स सदस्य महेंद्र पाटील, जितेंद्र डाकी, ललिता पाटील, काल्हेर ग्रामपंचायत सरपंच स्नेहा पाटील व ग्रा पं सदस्य, भाजपा तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे, छत्रपती पाटील, युवा मोर्चाचे पप्पू खंडागळे यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असताना ते झोपेचे सोंग घेत असून महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन सरकार असल्याची टिका देखील यावेळी पाटील यांनी केली असून . यापुढे जनतेला वेढीस धरण्याचे काम सरकारने करू नये नाही तर पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा देखील शेवटी कपिल पाटील यांनी दिला.

या आंदोलना नंतर मंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले ज्यामध्ये सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर नारपोली पोलिसांनी आंदोलनाचे आयोजक श्रीधर पाटील, छत्रपती पाटील यांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन या मार्गा वरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील