शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: घराघरांत भाजपकडून नागरिकांशी संवाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दिला आठ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 20:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये घरांघरांमध्ये नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला. खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांना मोदी यांनी केलेले कार्य स्पष्ट करून सांगितले. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही केले.

भाजपातर्फे सध्या देशभरात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत संपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. मोफत अन्न-धान्य, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान भारत योजना, मोफत कोरोना लसीकरण, फेरीवाल्यांना कर्जन, किसान सन्मान निधी, जनधन योजना, स्टॅंड अप इंडिया, कौशल्य विकास योजना आदी योजनांसह श्री राम मंदिराचे बांधकाम, काशी विश्वनाथ धाम व केदारनाथ धामचे नुतनीकरण, घटनेतील ३७० कलम रद्द, तिहेरी तलाक पद्धत रद्द आदींकडेही नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या योजनांच्या अंमलबजावणीतून कुटुंबांचा वैयक्तिक विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपाकडून नागरिकांना करण्यात आले. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधला. येऊरच्या आदिवासी वस्तींपासून मुंब्र्यातील वसाहतीत आणि नौपाड्यापासून गायमुखपर्यंत विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, आदी पदािधकारी आिण कार्यकर्ते माेठया प्रमाणात सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा