शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाणे: घराघरांत भाजपकडून नागरिकांशी संवाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दिला आठ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 20:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये घरांघरांमध्ये नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला. खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांना मोदी यांनी केलेले कार्य स्पष्ट करून सांगितले. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही केले.

भाजपातर्फे सध्या देशभरात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत संपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. मोफत अन्न-धान्य, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान भारत योजना, मोफत कोरोना लसीकरण, फेरीवाल्यांना कर्जन, किसान सन्मान निधी, जनधन योजना, स्टॅंड अप इंडिया, कौशल्य विकास योजना आदी योजनांसह श्री राम मंदिराचे बांधकाम, काशी विश्वनाथ धाम व केदारनाथ धामचे नुतनीकरण, घटनेतील ३७० कलम रद्द, तिहेरी तलाक पद्धत रद्द आदींकडेही नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या योजनांच्या अंमलबजावणीतून कुटुंबांचा वैयक्तिक विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपाकडून नागरिकांना करण्यात आले. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधला. येऊरच्या आदिवासी वस्तींपासून मुंब्र्यातील वसाहतीत आणि नौपाड्यापासून गायमुखपर्यंत विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, आदी पदािधकारी आिण कार्यकर्ते माेठया प्रमाणात सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा