शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

भाजप सरकारने मराठयांचा विश्वासघात केला, भारिप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 13:47 IST

मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले.

ठाणे - मराठयांच्या आरक्षणाचा निर्णय झालेला असतानाच भाजप सरकारने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सुमारे 17 महिने लावले. त्यामुळेच मराठयांचे आरक्षण कोर्टात रेंगाळत पडले, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला. दरम्यान, काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरु असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सोनोने यांनी सांगितले.भारिप बहुजन महासंघाच्या मेळाव्याचे ठाणे येथील एनकेटी सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक सोनोने बोलत होते. यावेळी  आमदार बाळाराम सिरस्कर, माजी आमदार हरिभाऊ भदे, ठाणे जिल्हा निरीक्षक रतन बनसोडे, कुशल मेश्राम, अमीत भुईगळ, डॉ. सुरेश शेळके, दशरथ भांडे, रााजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, राजू मालवीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अशोक सोनोने म्हणाले की, भारिपने सन 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यांना मोठया संख्येने आंबेडकरी समुदाय  प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काँग्रेसशी बोलणी सुरु आहेत. काँग्रेसने आम्हास प्रस्ताव दिला आहे. आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागितल्या असून या बारा जागांवर मराठा, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लीम अशा सर्वच जातप्रवर्गातील उमेदवारांना उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. जर, ही बोलणी यशस्वी ठरली तर ठिक अन्यथा, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.मराठा आरक्षणाबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता मिळवताना खोटी आश्वासने दिली होती. आधीच्या आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे कायद्यात रुपांतर या सरकारने केले नाही. कोर्टामध्येही वेळेवर प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले आहे, असा आरोप  केला. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण