शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

भाजपा नगरसेवकांकडूनच २७ गावांशी गद्दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 2:49 AM

केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. पण, तरीही २७ गावांतील युवकांना मात्र भाजपाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल शंका आहे. भाजपाचे नगरसेवकच २७ गावांशी गद्दारी करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी केला. स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये पाटील यांनी ही भूमिका मांडली. केडीएमसीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने खेळी करत संघर्ष समितीला अंधारात ठेवले. अचानक उमेदवार उभे केले. निवडून आलेले नगरसेवक आधी २७ गावांच्या नगरपालिकेबाबत अत्यंत आक्रमक होते. मात्र, निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांनी मूळ भूमिकेपासून ‘यू-टर्न’ घेत ती गावे महापालिकेतच राहावी, अशी भूमिका घेतली. मुळात महापालिका आधीच शहरी भागांत सोयीसुविधा देत नाही, ती या गावांमध्ये नव्याने काय सोयीसुविधा देणार, असा प्रश्न पाटील यांनी केला.सध्या गावांची स्थिती वाळीत टाकल्यासारखी झाली आहे. सुविधांअभावी पार बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत असताना गावांची स्थिती उत्तम होती. मात्र, तीन वर्षे पालिकेत येऊन अक्षरश: आमची वाट लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.>‘तो’ मॉल बंद कराकल्याण-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. त्याला निळजे येथील मॉल जबाबदार आहे. शिवाय तेथील गृहसंकुलातील लोकसंख्या वाढली आहे. मात्र, वाहतुकीचे नियोजन केलेले नाही. हा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत तो मॉल बंद ठेवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. याबाबतही लवकरच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका