शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपा नगरसेवक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत. हे कितपत योग्य आहे, असा सवाल संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केला. भर पावसाळ्यात बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असताना २७ गावांमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे या महापालिकेत राहायचे तरी कशाला?, असा सवालही त्यांनी केला.मागील आठवड्यात २७ गावांतील काही नगरसेवकांनी एकत्र येत केडीएमसीत राहण्यासाठी बैठक घेतली होती. पण त्यावेळी २७ गावांमधील सगळेच नगरसेवक हजर नव्हते. एका नगरसेविकेने तेथेही संघर्ष समितीचा मुद्दा लावून धरत स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेलाच काही नगरसेवक विरोध करत असतील तर फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, असेही पाटील म्हणाले.२७ गावांमधून जेवढा महसूल मिळतो, तेवढ्याच रक्कमेची अमृत योजना आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर आम्हीही ती राबवू शकतो. केडीएमसीने तीन वर्षांत आम्हाला दिले तरी काय?, ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ते पावसाचे पाणी साठवून दिवस ढकलत आहेत. पण महापालिका मात्र पाणी देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. ग्रामपंचायत काळात येथे २४ तास पाणी होते. आरोग्य सेवा नाही, चांगले रस्ते नाहीत, यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.मुख्यमंत्री त्यांचा शब्द नक्की पाळतील, असा विश्वास आहे. संघर्ष समितीचा पाठपुरावा योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच नगरपालिका झाली की नवी दिशा, नवा मार्ग मिळेल. ग्रामस्थांना सर्वतोपरी सुविधा दिल्या जातील असेही पाटील म्हणाले.‘त्या’ सुविधा स्वप्नवतच२७ गावांमधील शाळा अजूनही जिल्हा परिषदेकडून केडीएमसीकडे वर्ग झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या शाळांचा खर्चही जि. प. करतआहे. आरोग्य केंद्रेही जि. प. च्या ताब्यात आहेत.महापालिका पायाभूत सुविधा पुरवू शकत नसताना तेथे विरंगुळा, मनोरंजनाच्या सुविधा या तर स्वप्नवतच आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका होणेच आवश्यक आहे, यावर पाटील ठाम आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBJPभाजपा