शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपा नगरसेवक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सकारात्मक असताना त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक स्वतंत्र नगरपालिका नको, अशी भूमिका घेत आहेत. हे कितपत योग्य आहे, असा सवाल संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केला. भर पावसाळ्यात बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असताना २७ गावांमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे या महापालिकेत राहायचे तरी कशाला?, असा सवालही त्यांनी केला.मागील आठवड्यात २७ गावांतील काही नगरसेवकांनी एकत्र येत केडीएमसीत राहण्यासाठी बैठक घेतली होती. पण त्यावेळी २७ गावांमधील सगळेच नगरसेवक हजर नव्हते. एका नगरसेविकेने तेथेही संघर्ष समितीचा मुद्दा लावून धरत स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेलाच काही नगरसेवक विरोध करत असतील तर फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, असेही पाटील म्हणाले.२७ गावांमधून जेवढा महसूल मिळतो, तेवढ्याच रक्कमेची अमृत योजना आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर आम्हीही ती राबवू शकतो. केडीएमसीने तीन वर्षांत आम्हाला दिले तरी काय?, ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने ते पावसाचे पाणी साठवून दिवस ढकलत आहेत. पण महापालिका मात्र पाणी देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. ग्रामपंचायत काळात येथे २४ तास पाणी होते. आरोग्य सेवा नाही, चांगले रस्ते नाहीत, यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.मुख्यमंत्री त्यांचा शब्द नक्की पाळतील, असा विश्वास आहे. संघर्ष समितीचा पाठपुरावा योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच नगरपालिका झाली की नवी दिशा, नवा मार्ग मिळेल. ग्रामस्थांना सर्वतोपरी सुविधा दिल्या जातील असेही पाटील म्हणाले.‘त्या’ सुविधा स्वप्नवतच२७ गावांमधील शाळा अजूनही जिल्हा परिषदेकडून केडीएमसीकडे वर्ग झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या शाळांचा खर्चही जि. प. करतआहे. आरोग्य केंद्रेही जि. प. च्या ताब्यात आहेत.महापालिका पायाभूत सुविधा पुरवू शकत नसताना तेथे विरंगुळा, मनोरंजनाच्या सुविधा या तर स्वप्नवतच आहेत. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका होणेच आवश्यक आहे, यावर पाटील ठाम आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीBJPभाजपा