शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

बुद्धिजीवी मतदानाकडे पाठ फिरवण्याची भाजपाला भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:46 AM

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती.

कल्याण : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी चांगली कामे केली होती. त्यामुळे ते निवडून येतीलच, असा विचार भाजपाला पाठिंबा देणाऱ्या बुद्धीजीवी मंडळींनी केला. वाजपेयी यांना मतदान करायला आम्ही गेलो नाही तरी मतदार त्यांना मते देतील, अशा भ्रमात बुद्धिजीवी लोक राहिले. त्याचा परिणाम काय झाला हे सगळ््यांनाच माहिती आहे. त्याची पुनरावृत्ती २०१९ सालच्या निवडणूकीत होऊ नये, याकरिता बुद्धिजीवी वर्गाने मतदान करावे, असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मंगळवारी केले.बुद्धिजीवी वर्ग विविध विषयावर चर्चा खूप करतो. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान करीत नाही. त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, असे सिन्हा म्हणाले. कल्याणच्या पश्चिमेतील मंगेशी सभागृहात भाजपाच्या वतीने ‘बुद्धिजीवी संमेलना’चे आयोजन भाजपाचे आ. नरेंद्र पवार यांनी केले होते. त्यावेळी सिन्हा बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे खा. कपिल पाटील, नेते जगन्नाथ पाटील, डॉ. शुभा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.सिन्हा म्हणाले की, बुद्धिजीवी वर्गाने मतदान केले तर २०१९ सालच्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळणार आहेत. मात्र त्याकरिता भाजपाच्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. आपण मत दिले नाही तरी मोदी निवडून येतील या भ्रमात कुणीही राहू नये याकडे सिन्हा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.>फक्त अडीच लाख द्यायचे राहिलेराज्यमंत्री सिन्हा म्हणाले की, नरेंद्र मोदी मागील निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की, परदेशातील काळा पैसा भारतात आणून त्याचा विनियोग विकास कामांसाठी करणार आहे. मोदीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाखांतील १२ लाख ५० हजार रुपये विविध सबसिडी व योजनांच्या माध्यमातून यापूर्वी जमा केले आहेत.उर्वरित २ लाख ५० हजार रुपये अन्य योजनाच्या माध्यमातून द्यायचे बाकी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वी हे १५ लाख हा चुनावी जुमला असल्याचे म्हटले होते तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन’ ही ‘गले की हड्डी’ असल्याचे म्हटले होते.