शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टीवल, २० व्हरायटीजच्या बिर्याणी एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:43 IST

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. खुल्या मैदानात होणार ठाण्यातील हा एकमेव महोत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ठळक मुद्देठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवखवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणारलाईव्ह गजल सादर केली जाणार

ठाणे- ठाण्यात शुक्रवार ते रविवार २३, २४ ते २५ फेब्रुवारी या काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस संस्थेच्या वतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांची संस्था ठाणे आर्ट ग्रीड (टॅग) ने याला पाठींबा दिला आहे.

 या फेस्टीवलमध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा बिर्याणीच्या प्रसिध्द ब्रॅन्डच्या बिर्याणी या फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. इटालियन बिर्याणी, मियॉनीज बिर्याणी, झमझम बिर्याणी असे बिर्याणीचे वेगळे प्रकार देखील या फेस्टीवलमध्ये चाखता येणार आहेत.जवळपास २० विविध प्रकारच्या बिर्याणीची चव येथे उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आयोजक स्वराज्य इव्हेन्टसचे ह्रर्षद सर्मथ यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिनेनाट्य अभिनेते उदय सबनीस देखील उपस्थित होते. ठाण्याला कलासांस्कृतिक वारसेबरोबर खवय्येगिरीचा देखील वारसा आहे. इंदौर जसे खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिध्द आहे तसे ठाणे देखील प्रसिध्द आहे. बिर्याणी फेस्टीवलच्या माध्यमातून ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या बिर्याणीची चव चाखता येणार आहे, असे सबनीस यानी सांगितले.ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात २३ ते २५ फेब्रुवारी काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होणार आहे. तर शनिवार व रविवारी संध्याकाळी ५ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत फेस्टीवल सुरू राहणार आहे. खवय्याना बिर्याणीचा आस्वाद फेस्टीवलच्या ठिकाणीही घेता येणार असून पार्सलची देखील सोय उपलब्ध असणार आहे. बिर्याणीबरोबर विविध प्रकारचे स्टार्टस देखील फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. फेस्टीवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह गजल सादर केली जाणार आहे.

-------------------------------------------------------

थोड बिर्याणीविषयी....

बिर्याणी हा पर्शियन शब्द असून बिरीयन या नावापासून याची उत्पत्ती झाली. बिरीयन म्हणजे कुकींगच्या आधी फ्राय करून वनवलेला पदार्थ. पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण देश. मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणला. मुघलांच्या शाही मुदपकखान्यातून बिर्याणी केली जायची आत्ता ती भारतीयांच्या घराघरात बिर्याणी आवडीने खाल्ली जाते.

१५९३-१६३१ याकालखंडात शाहजहान बादशाहीची बेगम मुमताज ( जिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला) ही देखील बिर्याणीची शौकीन होती. तिच्या कल्पनेतून बिर्याणी या डिशचा उगम झाला असाही काहीजणांचा दावा आहे. मुघल शासक बाबर याच्या आगमनापूर्वीही बिर्याणी भारतीयांना माहीत होती असाही काही इतिहासकारांचा दावा आहे. भात हा मुख्य घटक सर्व प्रकारच्या बिर्याणीत असतो. विविध मसाले, पदार्थात मुरवून बिर्याणी केली जाते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई