शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टीवल, २० व्हरायटीजच्या बिर्याणी एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:43 IST

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. खुल्या मैदानात होणार ठाण्यातील हा एकमेव महोत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ठळक मुद्देठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी महोत्सवखवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणारलाईव्ह गजल सादर केली जाणार

ठाणे- ठाण्यात शुक्रवार ते रविवार २३, २४ ते २५ फेब्रुवारी या काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंन्टस संस्थेच्या वतीने बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांची संस्था ठाणे आर्ट ग्रीड (टॅग) ने याला पाठींबा दिला आहे.

 या फेस्टीवलमध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव आता चाखता येणार आहे. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी अशा बिर्याणीच्या प्रसिध्द ब्रॅन्डच्या बिर्याणी या फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. इटालियन बिर्याणी, मियॉनीज बिर्याणी, झमझम बिर्याणी असे बिर्याणीचे वेगळे प्रकार देखील या फेस्टीवलमध्ये चाखता येणार आहेत.जवळपास २० विविध प्रकारच्या बिर्याणीची चव येथे उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आयोजक स्वराज्य इव्हेन्टसचे ह्रर्षद सर्मथ यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिनेनाट्य अभिनेते उदय सबनीस देखील उपस्थित होते. ठाण्याला कलासांस्कृतिक वारसेबरोबर खवय्येगिरीचा देखील वारसा आहे. इंदौर जसे खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिध्द आहे तसे ठाणे देखील प्रसिध्द आहे. बिर्याणी फेस्टीवलच्या माध्यमातून ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या बिर्याणीची चव चाखता येणार आहे, असे सबनीस यानी सांगितले.ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात २३ ते २५ फेब्रुवारी काळात बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होणार आहे. तर शनिवार व रविवारी संध्याकाळी ५ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत फेस्टीवल सुरू राहणार आहे. खवय्याना बिर्याणीचा आस्वाद फेस्टीवलच्या ठिकाणीही घेता येणार असून पार्सलची देखील सोय उपलब्ध असणार आहे. बिर्याणीबरोबर विविध प्रकारचे स्टार्टस देखील फेस्टीवलमध्ये उपलब्ध असणार आहेत. फेस्टीवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह गजल सादर केली जाणार आहे.

-------------------------------------------------------

थोड बिर्याणीविषयी....

बिर्याणी हा पर्शियन शब्द असून बिरीयन या नावापासून याची उत्पत्ती झाली. बिरीयन म्हणजे कुकींगच्या आधी फ्राय करून वनवलेला पदार्थ. पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण देश. मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणला. मुघलांच्या शाही मुदपकखान्यातून बिर्याणी केली जायची आत्ता ती भारतीयांच्या घराघरात बिर्याणी आवडीने खाल्ली जाते.

१५९३-१६३१ याकालखंडात शाहजहान बादशाहीची बेगम मुमताज ( जिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला) ही देखील बिर्याणीची शौकीन होती. तिच्या कल्पनेतून बिर्याणी या डिशचा उगम झाला असाही काहीजणांचा दावा आहे. मुघल शासक बाबर याच्या आगमनापूर्वीही बिर्याणी भारतीयांना माहीत होती असाही काही इतिहासकारांचा दावा आहे. भात हा मुख्य घटक सर्व प्रकारच्या बिर्याणीत असतो. विविध मसाले, पदार्थात मुरवून बिर्याणी केली जाते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई