शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रस्त्यावरील खड्डयामुळे तरुणाच्या दुचाकीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 18:47 IST

रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागरीकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 कल्याण - रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. नागरीकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काल सायंकाळी नेवाळी नाक्यावरील चौकात असलेल्या खड्डय़ामुळे एका दुचाकी चालकाचा अपघात झाला. त्याची दुचाकी खड्डय़ात आदळल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. जखमी तरुणाचे नाव राजेंद्र मोरे असे आहे. तो कल्याण पूव्रेतील सह्याद्री लोकधारा इमारतीत राहतो.या अपघात प्रकरणी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र खड्डय़ामुळे अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांची श्रृखंला सुरुच आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. खड्डे नागरीकांच्या जिवावर बेतत असून देखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याची कारवाई केली जात नाही. त्याकडे डोळेझाक केली जाते. राजेंद्र मोरे यांच्या दुचाकीला काल सायंकाळी अपघात होऊन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. राजेंद्र हे कामोठे येथील एका पतपेढीत कामाला आहेत. काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीवरुन घराकडे येत असताना ही घटना घडली. राजेंद्र यांच्या दुचाकीवर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र गणोश हे देखील होते. त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. नेवाळी नाक्यावरील खड्डे भरले जात नसल्याने नेवाळी नाक्यावरील वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन खड्डे भरण्याचे काम केले होते. हे काम चार दिवसापूर्वीच करण्यात आले होते. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेऊन त्याठिकाणचे खड्डे बुजविले होते. अंबरनाथ शीळ मार्गावर नेवाळी नाका आहे. हा रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात आहेत. तसेच नेवाळी ते चक्की नाका हा रस्ता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. मोरे यांचा अपघात खड्डय़ामुळे झाला आहे. त्यांच्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आत्ता उपस्थित केला जात आहे. दोनच दिवसापूर्वी डोंबिवलीतील महिला प्रज्ञा रोङोकर यांच्या पायाला रस्त्यावरील खड्डय़ामुळे दुखापत झाली होती. ही घटना ताजी असताना राजेंद्र मोरे यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघात