शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

मतदान घटल्याने उंचावल्या दोन्ही उमेदवारांच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 4:10 AM

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे;

अजित मांडके

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे; परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे ३ लाख मतदार वाढलेले असतानाही मतदानाचा टक्का मात्र १.६४ टक्यांनी घटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या किंचितशा घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार? आणि धक्का कोणाला बसणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदार होते. पैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. असे असले तरी मतांचा टक्का हा १.६४ टक्यांनी घटला आहे. त्यामुळे या घटलेल्या मतांची चर्चा आता सुरू झाली आहे. ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या गडावर कब्जा केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे पुन्हा शिवसेनेने गड राखला. २०१९ च्या निवडणुकीत वाढलेल्या तीन लाख मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती; परंतु तसे काही घडले नाही. उलट मतदानाची टक्केवारी १.६४ टक्क्यांनी घटली.

विधानसभानिहाय विचार केल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघ वगळता मीरा-भाईंदरमध्ये ३ टक्क्यांनी मतांचा टक्का घसरला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही २.५० टक्क्यांनी मतदानाचा टक्का कमी झाला आहे. कोपरी-पाचपाखाडीमध्येही २ टक्क्यांनी मतदान घटले आहे. ऐरोली आणि बेलापूर हे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात असले, तरी या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का हा घसरला आहे. ऐरोली मतदारसंघात जवळजवळ ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बेलापूर मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी या मतदारसंघातही १ टक्के कमी मतदान झाले आहे. या सर्वच मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. ठाण्यात मात्र पाऊण टक्का मतदान वाढले आहे. आता त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे याकडे लक्ष लागले आहे. २मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी १ लाख १२ हजार ६९७ मते आता निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते कोणाच्या झोळीत जाणार? त्यावरच विजयाची गुढी उभारली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे मतदानात घट झाली आहे. तसेच मतदार याद्यांमधील घोळ, यादीतून गहाळ झालेली नावे आणि निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या ढिसाळ व्यवस्थेचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाला आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

सलग पाच दिवस आलेल्या सुट्टी आणि उन्हाचा पारा यामुळे मतदान कमी झालेले दिसते; परंतु यामुळे फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही. आमच्या पारंपरिक मतदारांनी उत्साह दाखविला आहे. - राजन विचारे, शिवसेना उमेदवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणे