शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मतदान घटल्याने उंचावल्या दोन्ही उमेदवारांच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 04:10 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे;

अजित मांडके

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे; परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे ३ लाख मतदार वाढलेले असतानाही मतदानाचा टक्का मात्र १.६४ टक्यांनी घटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या किंचितशा घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार? आणि धक्का कोणाला बसणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदार होते. पैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. असे असले तरी मतांचा टक्का हा १.६४ टक्यांनी घटला आहे. त्यामुळे या घटलेल्या मतांची चर्चा आता सुरू झाली आहे. ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या गडावर कब्जा केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे पुन्हा शिवसेनेने गड राखला. २०१९ च्या निवडणुकीत वाढलेल्या तीन लाख मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती; परंतु तसे काही घडले नाही. उलट मतदानाची टक्केवारी १.६४ टक्क्यांनी घटली.

विधानसभानिहाय विचार केल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघ वगळता मीरा-भाईंदरमध्ये ३ टक्क्यांनी मतांचा टक्का घसरला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही २.५० टक्क्यांनी मतदानाचा टक्का कमी झाला आहे. कोपरी-पाचपाखाडीमध्येही २ टक्क्यांनी मतदान घटले आहे. ऐरोली आणि बेलापूर हे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात असले, तरी या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का हा घसरला आहे. ऐरोली मतदारसंघात जवळजवळ ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बेलापूर मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी या मतदारसंघातही १ टक्के कमी मतदान झाले आहे. या सर्वच मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. ठाण्यात मात्र पाऊण टक्का मतदान वाढले आहे. आता त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे याकडे लक्ष लागले आहे. २मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी १ लाख १२ हजार ६९७ मते आता निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते कोणाच्या झोळीत जाणार? त्यावरच विजयाची गुढी उभारली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे मतदानात घट झाली आहे. तसेच मतदार याद्यांमधील घोळ, यादीतून गहाळ झालेली नावे आणि निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या ढिसाळ व्यवस्थेचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाला आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

सलग पाच दिवस आलेल्या सुट्टी आणि उन्हाचा पारा यामुळे मतदान कमी झालेले दिसते; परंतु यामुळे फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही. आमच्या पारंपरिक मतदारांनी उत्साह दाखविला आहे. - राजन विचारे, शिवसेना उमेदवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणे