शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

मतदान घटल्याने उंचावल्या दोन्ही उमेदवारांच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 04:10 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे;

अजित मांडके

ठाणे लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारेंविरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच होत आहे; परंतु मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे ३ लाख मतदार वाढलेले असतानाही मतदानाचा टक्का मात्र १.६४ टक्यांनी घटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या किंचितशा घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार? आणि धक्का कोणाला बसणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदार होते. पैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. असे असले तरी मतांचा टक्का हा १.६४ टक्यांनी घटला आहे. त्यामुळे या घटलेल्या मतांची चर्चा आता सुरू झाली आहे. ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या गडावर कब्जा केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे पुन्हा शिवसेनेने गड राखला. २०१९ च्या निवडणुकीत वाढलेल्या तीन लाख मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा सर्वांनाच वाटत होती; परंतु तसे काही घडले नाही. उलट मतदानाची टक्केवारी १.६४ टक्क्यांनी घटली.

विधानसभानिहाय विचार केल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघ वगळता मीरा-भाईंदरमध्ये ३ टक्क्यांनी मतांचा टक्का घसरला आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही २.५० टक्क्यांनी मतदानाचा टक्का कमी झाला आहे. कोपरी-पाचपाखाडीमध्येही २ टक्क्यांनी मतदान घटले आहे. ऐरोली आणि बेलापूर हे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात असले, तरी या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का हा घसरला आहे. ऐरोली मतदारसंघात जवळजवळ ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बेलापूर मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी या मतदारसंघातही १ टक्के कमी मतदान झाले आहे. या सर्वच मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. ठाण्यात मात्र पाऊण टक्का मतदान वाढले आहे. आता त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे याकडे लक्ष लागले आहे. २मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी १ लाख १२ हजार ६९७ मते आता निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते कोणाच्या झोळीत जाणार? त्यावरच विजयाची गुढी उभारली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे मतदानात घट झाली आहे. तसेच मतदार याद्यांमधील घोळ, यादीतून गहाळ झालेली नावे आणि निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या ढिसाळ व्यवस्थेचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाला आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

सलग पाच दिवस आलेल्या सुट्टी आणि उन्हाचा पारा यामुळे मतदान कमी झालेले दिसते; परंतु यामुळे फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही. आमच्या पारंपरिक मतदारांनी उत्साह दाखविला आहे. - राजन विचारे, शिवसेना उमेदवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणे