शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

भोपर, सागावचे रहिवासी पाणीटंचाईने हैराण, नागरिकांनी घेतली आयुक्तांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 21:06 IST

पाणी मिळायलाच हवे अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी पाठक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेतून काही भागामध्ये नांदीवली,

डोंबिवली: भोपर गावामध्ये आणि सागाव परिसरातील नागरिकांनी पुन्हा पाणी टंचाईचे फटके जाणवायला लागले आहेत. सणासुदीच्या काळात पाणी न मिळाल्याने गैरसोय होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींसह गावक-यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जाऊन आयुक्त गोविंद बोडके, पाणी पुरवठा अधिकारी राजीव पाठक आदींची भेट घेतली.

पाणी मिळायलाच हवे अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी पाठक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेतून काही भागामध्ये नांदीवली, पीअँडटी कॉलनी, तसेच स्टार कॉलनी आदींसह अन्य भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला. पण तरीही अन्य भागांमध्ये एमआयडीसीच्या कमी दाबाने पाणी सोडण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवापासून पाणी मिळत नसल्याने काय करायचे? त्यानंतर नवरात्री, दसरा, आणि आता तोंडावर दिवाळी आली तरी पाणी मिळत नाही हे योग्य नाही अशी संतप्त भावना रहिवाश्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राजीव पाठक म्हणाले की, रहिवासी, लोकप्रतिनिधी अमर माळी आदी बुधवारी भेटण्यासाठी आले होते. त्यांना वस्तूस्थिती स्पष्ट केली. अमृत योजनेच्या माध्यमाने भोपर गावात काम सुरू झाले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी दिड महिना अवधी लागणार आहे. तो पर्यंत मात्र पाणी टंचाईची समस्या भेडसावणार आहे. मात्र एमआयडीसीने पाणी चांगल्या दाबाने सोडल्यास पुरवठा देखिल चांगला होईल, काही दिवसांपासून पाणी कपातीचा निर्णय आल्यामुळे एमआयडीसीही नियमाचे पालन करत कमी दाबाने पाणी सोडत असल्याचे समजले. त्यामुळे त्यासंदर्भात संबंधित अधिका-यांना तातडीने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात पत्र पाठवल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. अधिका-यांच्या मतांशी सहमत असून पाणी समस्या तातडीने मार्गी लागावी एवढीच अपेक्षा असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणीdombivaliडोंबिवली