शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा ; शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

By नितीन पंडित | Updated: March 13, 2024 20:46 IST

डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना वाढल्या,नागरिक हैराण

नितीन पंडितभिवंडी: शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बसली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा ठेकेदाराचा ठेका रद्द झाल्याने महापालिकेने नवीन कचरा उचलण्यासाठी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे मात्र ठेकेदार नियुक्त झाला नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

भिवंडी शहर संवेदनशील शहर असून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शहरात राहत आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना मंगळवार पासून सुरू झाला आहे मात्र अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

शहरातील चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडबरोबरच शहराच्या मध्यभागी असलेल्या खडक रोड परिसरात सुरू केलेला डंपिंग ग्राउंडची समस्या अत्यंत गंभीर बनली असून खडक रोड परिसरातील डम्पिंग ग्राउंड नागरी वस्तीच्या मधोमध आहे.येथे कचरा संकलन होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यातच आता या डंपिंग ग्राउंडला आगी लग्नाच्या घटना शहरात रोज घडत आहेत त्यामुळे खडक रोड डम्पिंग ग्राउंड वर आग लागली की आजूबाजूच्या परिसरात उग्र धुर व उग्र दर्पाने नागरिक हैराण होत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही लोकप्रतिनिधी कचरा उचलून देत नाहीत,जर मनपा प्रशासनाने खाजगी वाहनातून कचरा उचलला तर कचरा उचलणाऱ्या कंत्राटी ठेकेदारांच्या गाड्या फोडल्या जातील असा दम काही लोकप्रतिनिधींनी भरला असल्याने शहरात कचरा उचलला जात नसल्याची चर्चा मनपा प्रशासनात सुरू आहे.एकीकडे कचरा समस्या तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी कचरा उचलण्यास केलेली अडकाठी यामुळे ऐन रमझान सणात मनपा प्रशासन प्रचंड अडचणीत आले असून मनपा आयुक्त अजय वैद्य यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे गरजेचे आहे.