शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:23 IST

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली.

- नितीन पंडित

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी झाल्याचे उघडच आहे. नगरसेवकांच्या या सौदेबाजीमुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या नेतेमंडळींच्या ही हार मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकहाती सत्ता असताना १८ नगरसेवक का फुटले? याचे चिंतन करण्याची वेळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आली आहे. नुसते महापौरपदच गमावले नसून काँग्रेसचे वर्चस्व आणि अस्तित्वही पणाला लागले आहे.

भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता २०१७ मध्ये शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन उपमहापौरपद शिवसेनेला दिले होते. तेव्हा काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. काँग्रेसची शहरावर एकहाती सत्ता असतानाही शहराची वाताहत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर जनतेचा रोष वाढला होता. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची महापालिकेत एकहाती हुकूमत होती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक कर्जबाजारी असल्याने हीच संधी साधत कोणार्कच्या नेत्यांनी लाखो रुपयांची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्याकडे खेचले. हा आकडा ३० लाखांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी दोन व्हिप काढले. एका व्हिपद्वारे त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका रिषिका राका तर दुसऱ्या व्हिपमध्ये कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. हे व्हिप काही दैनिकांमध्ये मतदानाच्या दिवशीच प्रसिद्ध केले होते. या व्हिपच्या आधारेच आपण कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांनी दिले आहे. तर दुसरीकडे आपण कोणार्कच्या बाजूने मतदान करण्याचा कोणताही व्हिप प्रसिद्ध केला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोट्यवधींचा सौदा झाला हे उघड आहे.

भिवंडीचा राजकीय इतिहास पहिला तर मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्याने येथे काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात नुसते महापौरपद नाही तर आमदार, खासदार ही पदेही पडली आहेत. निवडून आलेला काँग्रेस नेता सत्ता आपली जहागिरी असल्याप्रमाणे वागत असल्याने ती टिकवणे वेळोवेळी कठीण झालेले आहे. तसेच जनकल्याणाऐवजी स्वत:च्या आर्थिक सुबत्तेकडेच लक्ष देत असल्याने त्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसत आहे. मुस्लिम मते ही काँग्रेसची हक्काची आहेत, ही वृत्ती मारक ठरत असून मतदार आता हुशार झाले आहेत आणि ही बदलती परिस्थिती काँग्रेसचे नेते मानायला तयार नाहीत. त्यामुळेच खासदार, आमदार या पदांबरोबरच आता महापौरपदही काँग्रेसला गमवावे लागले आहे.

अहंकार आणि सौदेबाजी यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असून विधानसभा निवडणुकीत पूर्वेत समाजवादी पक्ष आणि पश्चिमेत एमआयएमने डोके वर काढले आहे. याचा फटका भविष्यात काँग्रेसला निश्चितच बसणार आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ सध्या समाजवादीच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली जाते, यातच सर्वकाही आले. पश्चिममध्ये एमआयएमचा शेवटच्या क्षणाला निसटता पराभव झाला होता. याची जाण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना असती तर आर्थिक घोडेबाजाराला काँग्रेसला लगाम घालता आला असता. नगरसेवक फुटणे ही पक्षासाठी भविष्यातील धोक्याची घंटाच असून पक्षनेतृत्वाने ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना