शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:23 IST

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली.

- नितीन पंडित

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी झाल्याचे उघडच आहे. नगरसेवकांच्या या सौदेबाजीमुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या नेतेमंडळींच्या ही हार मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकहाती सत्ता असताना १८ नगरसेवक का फुटले? याचे चिंतन करण्याची वेळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आली आहे. नुसते महापौरपदच गमावले नसून काँग्रेसचे वर्चस्व आणि अस्तित्वही पणाला लागले आहे.

भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता २०१७ मध्ये शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन उपमहापौरपद शिवसेनेला दिले होते. तेव्हा काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. काँग्रेसची शहरावर एकहाती सत्ता असतानाही शहराची वाताहत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर जनतेचा रोष वाढला होता. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची महापालिकेत एकहाती हुकूमत होती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक कर्जबाजारी असल्याने हीच संधी साधत कोणार्कच्या नेत्यांनी लाखो रुपयांची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्याकडे खेचले. हा आकडा ३० लाखांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी दोन व्हिप काढले. एका व्हिपद्वारे त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका रिषिका राका तर दुसऱ्या व्हिपमध्ये कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. हे व्हिप काही दैनिकांमध्ये मतदानाच्या दिवशीच प्रसिद्ध केले होते. या व्हिपच्या आधारेच आपण कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांनी दिले आहे. तर दुसरीकडे आपण कोणार्कच्या बाजूने मतदान करण्याचा कोणताही व्हिप प्रसिद्ध केला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोट्यवधींचा सौदा झाला हे उघड आहे.

भिवंडीचा राजकीय इतिहास पहिला तर मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्याने येथे काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात नुसते महापौरपद नाही तर आमदार, खासदार ही पदेही पडली आहेत. निवडून आलेला काँग्रेस नेता सत्ता आपली जहागिरी असल्याप्रमाणे वागत असल्याने ती टिकवणे वेळोवेळी कठीण झालेले आहे. तसेच जनकल्याणाऐवजी स्वत:च्या आर्थिक सुबत्तेकडेच लक्ष देत असल्याने त्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसत आहे. मुस्लिम मते ही काँग्रेसची हक्काची आहेत, ही वृत्ती मारक ठरत असून मतदार आता हुशार झाले आहेत आणि ही बदलती परिस्थिती काँग्रेसचे नेते मानायला तयार नाहीत. त्यामुळेच खासदार, आमदार या पदांबरोबरच आता महापौरपदही काँग्रेसला गमवावे लागले आहे.

अहंकार आणि सौदेबाजी यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असून विधानसभा निवडणुकीत पूर्वेत समाजवादी पक्ष आणि पश्चिमेत एमआयएमने डोके वर काढले आहे. याचा फटका भविष्यात काँग्रेसला निश्चितच बसणार आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ सध्या समाजवादीच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली जाते, यातच सर्वकाही आले. पश्चिममध्ये एमआयएमचा शेवटच्या क्षणाला निसटता पराभव झाला होता. याची जाण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना असती तर आर्थिक घोडेबाजाराला काँग्रेसला लगाम घालता आला असता. नगरसेवक फुटणे ही पक्षासाठी भविष्यातील धोक्याची घंटाच असून पक्षनेतृत्वाने ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना