शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संततधार पावसामुळे भिवंडीतील भाजी मार्केटमध्ये साचले पाणी; नागरिकांची प्रचंड गैरसोय

By नितीन पंडित | Updated: September 14, 2022 16:36 IST

निजामपुरा तीनबत्ती परिसरातील भाजी मार्केट पाण्याखाली गेल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती.

भिवंडी - भिवंडीत बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम असल्याने सकाळी शहरातील निजामपुरा तीनबत्ती परिसरातील भाजी मार्केट पाण्याखाली गेल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. या परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली होती.

या परिसरात महापालिकेच्या वतीने गटार नियोजन व्यवस्थित केले नसल्याने गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना या पाण्याचा मोठा त्रास होत असून साचलेले पाणी नागरिकांच्या घरातील नळांमध्ये जात असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असतो.त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने या साचणाऱ्या पाण्याकडे व नागरिकांना होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शासनाने शहरात निवडणुका न घेता मनपा प्रशासन शासनाने ताब्यात घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीRainपाऊस