शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'भिवंडी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:38 IST

नागरी सुविधा देण्यात अपयश; राज्यपालांकडे नागरिकांची मागणी

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू आहे. शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, बेसुमार बेकायदा बांधकामे आणि खराब रस्ते अशा विविध कारणांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि प्रशासन तसेच महापौर, उपमहापौर आणि लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करूनही लक्ष दिले जात नाही. शहरात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. नगरविकास विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे शहराचा विकास खुंटला असून राज्यपालांनी भिवंडी पालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.राज्य शासनाने भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. मात्र, या निधीतून अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी स्वत:चे उखळ पांढरे करत आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरु स्तीसाठी थातूरमातूर डांबरी पॅचवर्ककेले जात आहे. त्यामुळे १५ दिवसांतच रस्ते पुन्हा उखडत आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघात व वाहतूककोंडी होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेला सुमारे ५० कोटींचा निधी आला होता. मात्र, अडीच वर्षांत शहरातील स्वच्छता पाहता हा निधी नेमका कुठे मुरला, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरात क्षयरोग, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडेही तक्रारी करण्यात आल्या; मात्र प्रत्येक वेळी उच्चस्तरावरून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या या भ्रष्ट कारभाराविषयी राज्यपालांनी उच्चस्तरीय आणि गुन्हे शाखेतर्फे चौकशी करून महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक खालिद गुड्डू तसेच जागरूक नागरिक फारूक इक्बाल चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.भिवंडी महापालिका सर्वाधिक भ्रष्ट आणि स्वच्छता आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे ही महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे.- खालिद गुड्डू, एमआयएम

टॅग्स :Bhiwandiभिवंडी