शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

'भिवंडी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:38 IST

नागरी सुविधा देण्यात अपयश; राज्यपालांकडे नागरिकांची मागणी

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरू आहे. शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, बेसुमार बेकायदा बांधकामे आणि खराब रस्ते अशा विविध कारणांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि प्रशासन तसेच महापौर, उपमहापौर आणि लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करूनही लक्ष दिले जात नाही. शहरात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. नगरविकास विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे शहराचा विकास खुंटला असून राज्यपालांनी भिवंडी पालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.राज्य शासनाने भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. मात्र, या निधीतून अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी स्वत:चे उखळ पांढरे करत आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरु स्तीसाठी थातूरमातूर डांबरी पॅचवर्ककेले जात आहे. त्यामुळे १५ दिवसांतच रस्ते पुन्हा उखडत आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघात व वाहतूककोंडी होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेला सुमारे ५० कोटींचा निधी आला होता. मात्र, अडीच वर्षांत शहरातील स्वच्छता पाहता हा निधी नेमका कुठे मुरला, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरात क्षयरोग, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडेही तक्रारी करण्यात आल्या; मात्र प्रत्येक वेळी उच्चस्तरावरून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या या भ्रष्ट कारभाराविषयी राज्यपालांनी उच्चस्तरीय आणि गुन्हे शाखेतर्फे चौकशी करून महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक खालिद गुड्डू तसेच जागरूक नागरिक फारूक इक्बाल चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.भिवंडी महापालिका सर्वाधिक भ्रष्ट आणि स्वच्छता आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे ही महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे.- खालिद गुड्डू, एमआयएम

टॅग्स :Bhiwandiभिवंडी