शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

‘त्या’ बांधकामांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 23:21 IST

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामानाची साठवणूक या गोदामांमध्ये केली जाते.

भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर शासनाने उच्च न्यायालयात येथील रहिवाशांची बाजू मांडून गोदामे, घरे, झोपडपट्टीधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख तथा राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर आदी उपस्थित होते.

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामानाची साठवणूक या गोदामांमध्ये केली जाते. या गोदामांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केलेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई झाल्यास भिवंडी तालुक्यासह देशातील नामांकित कंपन्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच राहती घरे, झोपड्या तसेच पोल्ट्रीफार्म यांच्यावरदेखील कारवाई होणार असल्याने नागरिकांमध्ये आक्रोशाचे वातावरण आहे. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, असे धोरण तयार करून उच्च व सर्वोच्च न्यायालयात योग्य ती भूमिका मांडावी, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.

दरम्यान, भिवंडी तालुक्यातील रहिवाशांना कारवाईपासून वाचवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे कारवाईच्या कल्पनेने भयभीत झालेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे, असे शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याण