शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘त्या’ बांधकामांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 23:21 IST

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामानाची साठवणूक या गोदामांमध्ये केली जाते.

भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर शासनाने उच्च न्यायालयात येथील रहिवाशांची बाजू मांडून गोदामे, घरे, झोपडपट्टीधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख तथा राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर आदी उपस्थित होते.

भिवंडी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामानाची साठवणूक या गोदामांमध्ये केली जाते. या गोदामांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केलेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई झाल्यास भिवंडी तालुक्यासह देशातील नामांकित कंपन्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच राहती घरे, झोपड्या तसेच पोल्ट्रीफार्म यांच्यावरदेखील कारवाई होणार असल्याने नागरिकांमध्ये आक्रोशाचे वातावरण आहे. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, असे धोरण तयार करून उच्च व सर्वोच्च न्यायालयात योग्य ती भूमिका मांडावी, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.

दरम्यान, भिवंडी तालुक्यातील रहिवाशांना कारवाईपासून वाचवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे कारवाईच्या कल्पनेने भयभीत झालेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे, असे शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याण