शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

भिवंडीची वाटचाल भोपाळच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 00:27 IST

भिवंडीत वारंवार लागणाऱ्या आगींचे कारण अस्पष्ट असले तरी या गोदामपट्ट्यात सतत लागणाºया आगीच्या धुरात संशयाचे ढग जमा होत आहेत. ...

भिवंडीत वारंवार लागणाऱ्या आगींचे कारण अस्पष्ट असले तरी या गोदामपट्ट्यात सतत लागणाºया आगीच्या धुरात संशयाचे ढग जमा होत आहेत. विम्याच्या माध्यमातून आर्थिक लाभासाठीही या आगी लावल्या जात असाव्यात, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सतत लागणाºया या आगींमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे सरकारबरोबरच पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकार व पोलीस भोपाळसारख्या महाभयंकर घटनेची वाट बघते आहे का ? असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

भिवंडी तालुक्यातील सरकारी तसेच खाजगी जमिनीवर अनेक ठिकाणी बेकायदा गोदामे बांधली आहेत. गोदामांच्या विस्तीर्ण जाळ्यांमुळे औद्योगिक वसाहत असलेले शहर म्हणूनही भिवंडीला नावलौकिक मिळत आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंची गोदामे भिवंडीत थाटली आहेत. त्याचबरोबर केमिकलचा साठाही या गोदामांमध्ये केला जातो. या बेकायदा गोदामांवर कारवाईचे आदेशही उच्च न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही गोदामे सध्या तरी तुटणार नसल्याची चर्चा आहे. काही गोदामचालक व मालकांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुतांश गावे एमएमआरडीएच्या अधिकारात आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे व कारवाईचे अधिकार एमएमआरडीए प्रशासनाला आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन गोदामे पाडण्याची कारवाई सुरू होणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू केले आहे. भिवंडी परिसरात असलेल्या या बेकायदा गोदामांमुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे.

भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदा ज्वलनशील केमिकलची साठवणूक केली जाते. या साठ्यांवर कारवाईचे आदेश सरकारने देताच सुमारे १६५ गोदामांना नोटिसा बजावल्या. भिवंडीतील गोदामपट्ट्यात रासायनिक द्रव्याचा साठा व अन्य साधनसामग्रीच्या सुमारे ७४० गोदामांना वर्षभरात आगी लागल्या आहेत. या आगीच्या वाढत्या घटनांमुळे भिवंडीचा भोपाळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या गोदामांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भिवंडी परिसरात काल्हेर, कशेळी, राहनाळ, वळ, गुंदवली, दापोडा, माणकोली, अंजूर, केवणी, कोपर, सारंग, सुरई, दिवे अंजूर, वेहळे, ओवळी, सरवली, कोनगाव, पिंपळास, सोनाळे, भोईरगाव, वाहुली, सापे, वडपे, पडघा आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदामे असून यातील वळ, माणकोली, राहनाळ, गुंदवली, काल्हेर, दापोडे, सरवली, कोपर, पूर्णा, कोनगाव, भोईरगाव, वडपे, सोनाळे या ठिकाणी केमिकलची ३७० गोदामे असून याबाबत तपासणी करून १६५ गोदामांना नोटिसा दिल्या आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असा अतिधोकादायक केमिकलचा साठा आहे. त्यांची सुरक्षा नसल्याने वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी राहनाळ येथे लागलेल्या आगीत लाकडाच्या वखारीत झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगारांचा बळी गेला. गोदामांना वारंवार आगी लागण्याच्या घटना सुरु असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल, रबर, प्लास्टिक, डांबरसाठा असलेल्या गोदामांना भीषण आग लागली. या आगीत ५ गोदामे जळून खाक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदा केमिकल गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदामांवर कारवाईचे आदेश देऊनही आर्थिक संबंधांमुळे कारवाई होत नाही.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदामपट्ट्यात अग्निशमन दल केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने येथील आगीवर नियंत्रणासाठी भिवंडी शहरासह ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई येथील अग्निशमन दलास पाचारण करण्याची नामुश्की ओढवते.भिवंडीतील गोदामांना मागील काही महिन्यांपासून सातत्याने आगी लागत आहेत. यामुळे सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. या गोदामांवर कारवाई करायला सांगूनही केवळ भ्रष्टाचारामुळे होत नाही हेही सत्य आहे. सरकारने बेकायदा गोदामांवर वेळीच कारवाई न केल्यास भिवंडीचे भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीbhopal-pcभोपाळthaneठाणे