शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

भिवंडीत कंत्राटदार जोमात, तर रस्ते कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

भिवंडी : शहरात खड्ड्यांमधून रस्ता शाेधावा लागत आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर माेठमाेठ्या खड्ड्यांमध्ये चिखलपाण्याची डबकी ...

भिवंडी : शहरात खड्ड्यांमधून रस्ता शाेधावा लागत आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर माेठमाेठ्या खड्ड्यांमध्ये चिखलपाण्याची डबकी साचली आहेत. त्यातून नागरिकांना माेठ्या काैशल्याने मार्ग काढण्याचे दिव्य पार पाडावे लागत असून, चिखलामुळे दुचाकी घसरून अपघातांची मालिकाच सुरू आहे. भिवंडी महापालिका प्रशासन मात्र कंत्राटदारावर काेणतीही कारवाई न करता केवळ रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देऊन हात झटकत असल्यामुळे खड्ड्यांची पिडा संपता संपत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

भिवंडीतील बहुतांश डांबरी रस्ते हे ईगल इन्फ्रा कंपनीने तयार केले आहेत. निकृष्ट दर्जामुळे नागरिकांना त्यावरून प्रवास करताना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. मागील वर्षी धामणकर नाका ते कामतघर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर केमिकलमिश्रित डांबर टाकल्याची पोलखोल स्थानिकांनी केली होती. मनपा प्रशासनाने या कंत्राटदारावर कारवाई न करता या कंपनीस रस्त्याचा काही भाग दुरुस्त करण्यास सांगितले. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे शहरातील रस्ते खड्ड्यांत गेले असल्याचा आराेप करण्यात येत आहे.

भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटा ते चिंचोटी या महामार्गावर सुप्रीम कंपनी टाेलवसुली करीत आहे. त्यामुळे टाेलवसुली जोमात तर रस्ते कोमात अशी या महामार्गाची स्थिती आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये मंजूर केले होते. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम मयूर कन्स्ट्रक्शन या खासगी ठेकेदाराने केले. मात्र, या कंत्राटदारानेही सुप्रीमच्याच पावलावर पाऊल ठेवल्याने सात कोटींचा चुराडा झाला.

भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था

भिवंडी-वाडा महामार्गाचीही हीच स्थिती आहे. येथे सुप्रीम कंपनी टाेल वसूल करीत होती. मात्र, दोन वर्षांपासून टोलनाका बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आहे. या रस्त्याच्या डागडुजीचा ठेका मयूर कन्स्ट्रक्शनकडे आहे. आतापर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीवर तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये भिवंडी-वडप मार्गाची दुरुस्तीही मयूर कन्स्ट्रक्शनने केली आहे. या सर्वच ठेकेदारांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदारांना प्रशासनाची कोणतीही भीती राहिलेली नाही.