शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 06:19 IST

भिवंडी इमारत दुर्घटना, शहरातील फुलेनगर परिसरात सुनील परिवारासह राहतो. सुनीलच्या वडिलांना लकव्याचा आजार असून, आई लहानपणीच वारली आहे.

नितीन पंडितभिवंडी : इमारत दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली तब्बल २० तास अडकून राहिलेल्या तरुणाला सकाळी आठच्या सुमारास बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. विशेष महत्त्वाचे म्हणजे, या तरुणाचा रविवारी वाढदिवस असल्याने, या दिवशी मृत्यूच्या दारातून परत येत, पुनर्जन्मच झाल्याची भावना तरुणाने व्यक्त केली आहे. सुनील पिसाळ (वय ३०) असे दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. 

शहरातील फुलेनगर परिसरात सुनील परिवारासह राहतो. सुनीलच्या वडिलांना लकव्याचा आजार असून, आई लहानपणीच वारली आहे. चार महिन्यांपूर्वी जानेवारीत सुनीलचे लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे, अशा परिस्थितीत घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, सुनील दुर्घटनाग्रस्त इमारतीत काम करत होता आणि शनिवारी अचानक इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुनील अडकून पडला होता. रविवारी सकाळी आठ वाजता २० तासांनंतर बचाव पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले. सकाळी बचाव पथकाचे काम सुरू झाल्यापासूनच सुनीलच्या जगण्याची आशा पल्लवीत झाली आणि सुनीलने बचाव पथकाच्या हाकेला हाक दिली. सुनीलच्या आवाजावरूनच अंदाज घेत, बचाव पथकाने सुनीलला बाहेर काढले. त्याने बचाव पथकाचे आभार मानले. ढिगाऱ्याखालून बाहेर येताच, मित्रांनी आणि नातेवाइकांनी सुनीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

घर आणि मित्र परिवाराचे आशीर्वाद आणि बचाव पथकाच्या अथक मेहनतीनेच आज मला पुनर्जन्म मिळाला असून, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. - सुनील पिसाळ, सुखरूप बचावलेला तरुण.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना