शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

Bhiwandi Building Collapse: शेख कुटुंबावर काळाचा घाला; एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 23:51 IST

वृद्ध मातापित्यांचा आधारवड हरपला 

- नितिन पंडीत 

भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथे तीन माजली जिलानी हि धोकादायक इमारत कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजता घडली आहे . या दुर्घटनेत आता पर्यंत 23 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. दरम्यान दुर्घटना झालेला हा सोमवार या इमारतीत राहणाऱ्या शेख कुटुंबियांसाठी काळा दिवस ठरला आहे. शेख परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याने संपूर्ण परिवारावर काळाने घाला घातला आहे. दोन कर्ती मुले गमावल्याने आपला आधरवडच हरपला असल्याने आता कुणाच्या भरवशावर जगायचे असा प्रश्न वृद्ध मातापित्यांना पडला आहे. 

57 वर्षांचे युसूफ शेख हे आपल्या मूळगावी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी या गावी आपल्या पत्नी व लहान मुलगा सोहेल ( वय वर्ष 21 ) यांच्या सोबत राहतात. सोहेल याने बीए ची परीक्षा दिली असून सुट्यांमध्ये एक महिन्यांपूर्वीच सोहेल हा भिवंडीतील आपला मोठा भाऊ आरिफ याच्या घरी एका महिन्यासाठी राहायला आला होता. 3 ऑक्टोबरला एका परीक्षेसाठी तो पुन्हा गावाला जाणार होता मात्र या इमारत दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे . तर मोठा मुलगा आरिफ युसूफ शेख ( वय 35 )  हा 2001 साली मोठ्या बहिणीच्या लग्नांनंतर भिवंडीत आले होते. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या आरिफ यांचा 12 वर्षांपूर्वी नसीमा यांच्यासोबत निकाह झाला होता . त्यांना दहा वर्षांची निदा व आठ वर्षांची लड्डू व एक तीन वर्षांचा मुलगा हसनैन अशी एकूण तीन मुले होती. आपल्या परिवारासह एक वर्षांपूर्वीच आरिफ दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायला आले होते. इमारत धोकादायक असल्याने आरिफ दुसरीकडे राहण्यासाठी घर शोधात होते मात्र घर शोधण्याच्या आधीच सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आरिफ शेख यांचा संपूर्ण परिवार उध्वस्त झाला. इमारत दुर्घटनेत आरिफ शेख यांच्यासह त्यांची पत्नी नसीमा मुलगी निदा व लड्डू तसेच लहान मुलगा हसनैन यांच्यासह लहान भाऊ सोहेल अशा सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने या शेख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगळवारी आरिफ व सोहेल यांचे वडील युसूफ शेख हे भिवंडीत आले असून उध्वस्त झालेल्या परिवाराच्या आठवणीत त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. सोहेल हा मला रोज फोन करून माझी विचारपूस करत असे बाबा तुम्ही माझी काळजी करू नका आईकडे लक्ष द्या असा फोन सोहेल याने मला रविवारी रात्री नऊ वाजता केला होता त्यावेळी आरिफसह नातवंडांशीही माझे बोलणे झाले होते आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास इमारत कोसळल्याचा फोन आला तेव्हापासून माझे हातपायच गळून गेले आहेत. त्यांची आई देखील गावी प्रचंड मानसिक तणावात सापडली आहे. आता पुढचे आयुष्य कुणाच्या भरवशावर काढणार अशी भावनिक प्रतिक्रिया युसूफ शेख यांनी दिली आहे . 

मी मागच्या आठवड्यात माझ्या छोट्या बहिणीची तब्बेत बारी नसल्याने तिला पाहायला उदगीर येथे गेले होते रविवारीच आम्ही उदगीर येथून भिवंडीत येण्यासाठी निघालो होतो मात्र इथे आल्यावर हि दुर्दैवी घटना पाहायला मिळेल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता अशी प्रतिक्रिया मृत आरिफ शेख यांची मोठी बहीण परवीन युनूस शेख यांनी दिली आहे. 

रविवार असल्याने सोहेल मामा दुपारी तसेच रात्री दोन वेळ वेळा आमच्या घरी आले होते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मी त्यांना माझ्या घरी जेवणासाठी आग्रह धरला होता व त्यांना माझ्याच घरी राहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी काहीएक न एकता ते मोठे मामा आरिफ यांच्या घरी गेले आणि रात्री हि दुर्घटना घडली ते जर माझ्या घरी राहिले असते तर आज वाचले असते अशी भावनिक प्रतिक्रिया मृत आरिफ व सोहेल यांचा भाचा सरीफ युनूस शेख याने दिली आहे .