शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

भिवंडी आगरी महोत्सवात साकारणार ओल्या दुष्काळाची प्रतिकृती: विशुभाऊ म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 02:17 IST

२३ ते २६ जानेवारीदरम्यान महोत्सवाचे आयोजन

- नितीन पंडित भिवंडी : भिवंडी येथे २३ ते २६ जानेवारी २0२0 या चार दिवसांच्या कालावधीत आगरी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा सोनाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विशुभाऊ म्हात्रे यांनी बुधवारी सोनाळे ग्राम पंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात राज्यात पडलेल्या ओला दुष्काळाची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहितीदेखील म्हात्रे यांनी यावेळी दिली.

आगरी संस्कृती व तिचा मूळ वारसा जतन करण्याच्या उद्देशाने, तसेच भावी पिढीला आगरी संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी या भिवंडी आगरी महोत्सवाचे दरवर्षी सोनाळे येथील क्रीडा मैदानात आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे सातवे वर्ष आहे. आगरी संस्कृतीबरोबरच वारकरी संप्रदायाचे महात्म्यदेखील या महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी नागरिकांसमोर मांडण्यात येत असते.

दरम्यान, मोहत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसी कॅमेरे आणि संस्थेचे खासगी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक तसेच पोलिसांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली.या महोत्सवाचे नाव आगरी मोहोत्सव असले तरी, हा महोत्सव सर्व जातीधर्मांच्या नागरिकांचा महोत्सव असल्याने सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष हनुमान पाटील, ज्ञानेश्वर ओम मुकादम, आहोक पालकर, अनिल गजरे, मनोहर तरे, संदीप पाटील, कैलास मढवी, आत्माराम वाकडे, अमर म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह आगरी मोहोत्सव समितीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचा सन्मान

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १0 मान्यवरांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात पडलेल्या ओला दुष्काळ व भिवंडीतील घर, गोदामांवर होणाºया कारवाईची निषेधात्मकप्रतिकृती देखील महोत्सवात साकारण्यात येणार आहे. प्रसिद्ध निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे या महोत्सवास भेट देण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMaharashtraमहाराष्ट्र