शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भिवंडीत भीषण अग्नितांडव; दापोडा भागातील गोदामे भस्मसात; इलेक्ट्रॉनिक वस्तू, वॉटर प्युरिफायर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:50 IST

भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठाणे/भिवंडी : भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याकरिता मुंबईहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. ही आग पूर्णपणे विझवण्याकरिता आणखी काही तास लागतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.भिवंडी, दापोडा भागातील १६१ कॉर्पोरेशन, इंडियन गेट कंपनी माणकोली, व्हीआरएल लॉजिस्टीक यांच्या गोदामाला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूची किमान १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या, कल्याण महापालिकेच्या गाड्या अपुºया पडल्याने मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कुमक मागवावी लागली. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली असली, तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी किमान १० ते १२ तासांचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली.काही दिवसांपूर्वी भिवंडीत गोदामाला आग लागली होती. शनिवारी दुपारी पुन्हा माणकोली भागातील व्हीआरएल लॉजिस्टीक या गोदामाला आग लागली. तिने आजूबाजूच्या गोदामांना ज्वाळांमध्ये लपेटले. सुरुवातीला अ‍ॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या दाण्यांच्या साठ्यांनी लागलीच पेट घेतला. भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामात पसरली. तेथे साठवलेले फ्रीज, एसी, पंखे तसेच इतर इलेक्ट्रीक वस्तूंची सात गोदामे जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सुमारे ५० ते १०० मीटर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीची सात गोदामे, अ‍ॅपेक्स मिनरल वॉटर कंपनीची तीन गोदामे व इतर केमिकल कंपन्यांची दोन गोदामे यांची मोठी हानी झाली.आगीच्या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. काही हौशी वाहनचालकांनी आगीच्या धुरांचे लोट मोबाइलमध्ये चित्रित करण्याकरिता आपली वाहने रस्त्यात थांबवून चित्रीकरण सुरू केले होते.उच्चस्तरीय चौकशीची मागणीअग्नितांडव सुरू होताच या परिसरातील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला. त्यामुळे जीवितहानी झाली नसावी, असा अंदाज आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.आजूबाजूच्या गोदामांमधील कामगारांनी व बघ्यांनी केलेली गर्दी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याकरिता चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी सांगितले.फेब्रुवारी-मार्चदरम्यान भिवंडीतील गोदाम भागात आगीचे प्रमाण वाढत असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली. आग विझवण्यासाठी या परिसरातील पाणीटंचाईमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले.कल्याणमध्ये बसला आगकल्याण : खाजगी बसचे इंजीन गरम झाल्याने त्याने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी सहजानंद चौकात घडली. या बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :fireआग