शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भिवंडीत भीषण अग्नितांडव; दापोडा भागातील गोदामे भस्मसात; इलेक्ट्रॉनिक वस्तू, वॉटर प्युरिफायर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:50 IST

भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठाणे/भिवंडी : भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याकरिता मुंबईहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. ही आग पूर्णपणे विझवण्याकरिता आणखी काही तास लागतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.भिवंडी, दापोडा भागातील १६१ कॉर्पोरेशन, इंडियन गेट कंपनी माणकोली, व्हीआरएल लॉजिस्टीक यांच्या गोदामाला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूची किमान १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या, कल्याण महापालिकेच्या गाड्या अपुºया पडल्याने मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कुमक मागवावी लागली. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली असली, तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी किमान १० ते १२ तासांचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली.काही दिवसांपूर्वी भिवंडीत गोदामाला आग लागली होती. शनिवारी दुपारी पुन्हा माणकोली भागातील व्हीआरएल लॉजिस्टीक या गोदामाला आग लागली. तिने आजूबाजूच्या गोदामांना ज्वाळांमध्ये लपेटले. सुरुवातीला अ‍ॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या दाण्यांच्या साठ्यांनी लागलीच पेट घेतला. भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामात पसरली. तेथे साठवलेले फ्रीज, एसी, पंखे तसेच इतर इलेक्ट्रीक वस्तूंची सात गोदामे जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सुमारे ५० ते १०० मीटर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीची सात गोदामे, अ‍ॅपेक्स मिनरल वॉटर कंपनीची तीन गोदामे व इतर केमिकल कंपन्यांची दोन गोदामे यांची मोठी हानी झाली.आगीच्या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. काही हौशी वाहनचालकांनी आगीच्या धुरांचे लोट मोबाइलमध्ये चित्रित करण्याकरिता आपली वाहने रस्त्यात थांबवून चित्रीकरण सुरू केले होते.उच्चस्तरीय चौकशीची मागणीअग्नितांडव सुरू होताच या परिसरातील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला. त्यामुळे जीवितहानी झाली नसावी, असा अंदाज आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.आजूबाजूच्या गोदामांमधील कामगारांनी व बघ्यांनी केलेली गर्दी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याकरिता चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी सांगितले.फेब्रुवारी-मार्चदरम्यान भिवंडीतील गोदाम भागात आगीचे प्रमाण वाढत असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली. आग विझवण्यासाठी या परिसरातील पाणीटंचाईमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले.कल्याणमध्ये बसला आगकल्याण : खाजगी बसचे इंजीन गरम झाल्याने त्याने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी सहजानंद चौकात घडली. या बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :fireआग