शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

भिवंडीत भीषण अग्नितांडव; दापोडा भागातील गोदामे भस्मसात; इलेक्ट्रॉनिक वस्तू, वॉटर प्युरिफायर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:50 IST

भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठाणे/भिवंडी : भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याकरिता मुंबईहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. ही आग पूर्णपणे विझवण्याकरिता आणखी काही तास लागतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.भिवंडी, दापोडा भागातील १६१ कॉर्पोरेशन, इंडियन गेट कंपनी माणकोली, व्हीआरएल लॉजिस्टीक यांच्या गोदामाला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूची किमान १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या, कल्याण महापालिकेच्या गाड्या अपुºया पडल्याने मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कुमक मागवावी लागली. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली असली, तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी किमान १० ते १२ तासांचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली.काही दिवसांपूर्वी भिवंडीत गोदामाला आग लागली होती. शनिवारी दुपारी पुन्हा माणकोली भागातील व्हीआरएल लॉजिस्टीक या गोदामाला आग लागली. तिने आजूबाजूच्या गोदामांना ज्वाळांमध्ये लपेटले. सुरुवातीला अ‍ॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या दाण्यांच्या साठ्यांनी लागलीच पेट घेतला. भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामात पसरली. तेथे साठवलेले फ्रीज, एसी, पंखे तसेच इतर इलेक्ट्रीक वस्तूंची सात गोदामे जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सुमारे ५० ते १०० मीटर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीची सात गोदामे, अ‍ॅपेक्स मिनरल वॉटर कंपनीची तीन गोदामे व इतर केमिकल कंपन्यांची दोन गोदामे यांची मोठी हानी झाली.आगीच्या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. काही हौशी वाहनचालकांनी आगीच्या धुरांचे लोट मोबाइलमध्ये चित्रित करण्याकरिता आपली वाहने रस्त्यात थांबवून चित्रीकरण सुरू केले होते.उच्चस्तरीय चौकशीची मागणीअग्नितांडव सुरू होताच या परिसरातील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला. त्यामुळे जीवितहानी झाली नसावी, असा अंदाज आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.आजूबाजूच्या गोदामांमधील कामगारांनी व बघ्यांनी केलेली गर्दी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याकरिता चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी सांगितले.फेब्रुवारी-मार्चदरम्यान भिवंडीतील गोदाम भागात आगीचे प्रमाण वाढत असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली. आग विझवण्यासाठी या परिसरातील पाणीटंचाईमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले.कल्याणमध्ये बसला आगकल्याण : खाजगी बसचे इंजीन गरम झाल्याने त्याने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी सहजानंद चौकात घडली. या बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :fireआग