शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भार्इंदरची परिवहनसेवा खिळखिळी, ५८ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:14 IST

अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत.

- धीरज परबमीरा रोड : अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत. टायर, दुरुस्तीच्या कामांचे पैसे देण्यास वा आधीची थकबाकी असल्याने ही नामुश्की ओढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचा परिणाम परिवहनसेवेवर होऊन प्रवासी त्रासले आहेत. गंभीर बाब म्हणजे पावसाळा सुरू झाला असताना बसचे वायपर बंद आहेत.आघाडी सरकारच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेस ५० बस अनुदानावर मिळाल्या होत्या. त्या काही वर्षांतच भंगारात निघाल्या. नंतर, पुन्हा काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत महापालिकेस तब्ब्ल १०० बस मोफत मिळाल्या. अनेक बसेसचा खुळखुळा झाला आहे. टायर नाही, कधी इंधनासाठी पैसे नाहीत, अशा कारणांनी परिवहनसेवा ठप्प होत आहे.सध्या ५८ बस आहेत. त्यात व्हॉल्वो एसी बसचाही समावेश आहे. सध्या ३२ बसच रस्त्यावर धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. बस नसल्यास प्रवाशांना नाइलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.सध्या प्लेझंट पार्कयेथील आगारात नादुरु स्त बस उभ्या आहेत. खराब झालेले टायर रांगेने लावलेले आहेत. टायर खरेदीअभावी सुमारे २२ बस बंद आहेत. याआधीही ढिसाळपणामुळे टायरखरेदी होत नव्हती. आताही टायरखरेदीसाठी पैसे दिले जात नसल्याने वितरकाने नवीन टायर देणे बंद केले आहे.निधीच देत नाहीबसच्या देखभाल दुरु स्तीसाठी पालिकेने सत्यम मोटार्स, ओम मोटार्स, कमल मोटार्स या तिघांना विभागून कामे दिली आहेत. परंतु, कामाचा मोबदला व लागणाऱ्या सुट्या भागांचे पैसेच पालिका रखडवत असल्याने त्याचा विपरित परिणाम देखभालीवर झालेला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका मीरा-भाईंदरमधील सामान्य प्रवाशांना विनाकारण सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.परिवहन ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. टायर, देखभाल दुरु स्ती वा अन्य आवश्यक बाबींसाठी आपल्याकडे देयक देण्याची प्रकरणे आली, तर ती लगेच मंजूर केली जातात. पालिकेकडे त्यासाठी निधी आहे.- शरद बेलवटे, मुख्य लेखाधिकारीसध्या ३६ बस या प्रवाशांच्या सेवेत सुरू आहेत. बाकीच्या बस देखभाल-दुरु स्तीसाठी बंद आहेत. येत्या दोन ते चार दिवसांत प्रलंबित देयकांचा प्रश्न व दुरु स्ती आदी कामे मार्गी लागतील.- स्वाती देशपांडे, उपव्यवस्थापक, परिवहनआमच्या प्रभागात बससेवेची समस्या नाही. मीरा रोड ते ग्रीन व्हिलेज-वेस्टर्न पार्कअशी पालिकेची बससेवा नियमित सुरू आहे.- सचिन म्हात्रे, नगरसेवकमुर्धा ते उत्तन व पाली- चौक भागातील प्रवासी हे पालिकेच्या बससेवेवर अवलंबून असतात. पालिकेला मोठा फायदाही होतो. तरीही या भागातील नागरिकांना चांगली सेवा मिळत नाही. बसच्या फेºया कमी असून वेळेवर बस येत नाहीत. सेवा ठप्प झाली आहे. परिवहनसेवेचा बोजवारा उडाला आहे.- शर्मिला बगाजी, नगरसेविका

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक