शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पत्रीपुलासाठी नागरिकांचे ‘भीक मांगो आंदोलन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:03 IST

पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.

ठळक मुद्देपूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही.नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

कल्याण - पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी (9 जून) नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे. जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

धोकादायक अवस्थेतील ब्रिटीशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्यस्थितीला बाजुकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असलीतरी तरी हा पूल अरूंद असल्याने तासनतास वाहतूक कोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांना करावा लागत आहे. जून्या पूलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच  30 डिसेंबरला या नवीन पूलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पुर्ण करू असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपुर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान एमएसआरडीसीने स्वीकारावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. दरम्यान पाच महिन्यात पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. 

पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. नव्या पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याठिकाणी आता नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरूणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणोला सवाल केला होता. रविवारी देखील स्थानिक नागरीकांनी पत्रीपूल परिसरात भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठविणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. यावेळी वाहनचालकांनी नागरीकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी