शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पत्रीपुलासाठी नागरिकांचे ‘भीक मांगो आंदोलन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:03 IST

पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.

ठळक मुद्देपूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही.नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

कल्याण - पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी (9 जून) नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे. जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

धोकादायक अवस्थेतील ब्रिटीशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्यस्थितीला बाजुकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असलीतरी तरी हा पूल अरूंद असल्याने तासनतास वाहतूक कोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांना करावा लागत आहे. जून्या पूलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच  30 डिसेंबरला या नवीन पूलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पुर्ण करू असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपुर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान एमएसआरडीसीने स्वीकारावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. दरम्यान पाच महिन्यात पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. 

पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. नव्या पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याठिकाणी आता नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरूणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणोला सवाल केला होता. रविवारी देखील स्थानिक नागरीकांनी पत्रीपूल परिसरात भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठविणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. यावेळी वाहनचालकांनी नागरीकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी