शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

पत्रीपुलासाठी नागरिकांचे ‘भीक मांगो आंदोलन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:03 IST

पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.

ठळक मुद्देपूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे.जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही.नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

कल्याण - पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी (9 जून) नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीक मांगो आंदोलन’ छेडले आहे. जूना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शविला. 

धोकादायक अवस्थेतील ब्रिटीशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्यस्थितीला बाजुकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असलीतरी तरी हा पूल अरूंद असल्याने तासनतास वाहतूक कोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांना करावा लागत आहे. जून्या पूलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच  30 डिसेंबरला या नवीन पूलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पुर्ण करू असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपुर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान एमएसआरडीसीने स्वीकारावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. दरम्यान पाच महिन्यात पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. 

पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. नव्या पूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याठिकाणी आता नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम सुरू आहे. परंतू हे काम संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरूणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणोला सवाल केला होता. रविवारी देखील स्थानिक नागरीकांनी पत्रीपूल परिसरात भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठविणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. यावेळी वाहनचालकांनी नागरीकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी