शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

भाईंदर पालिका: सात नगरसेवकांवरील सुनावणी सात महिन्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:43 IST

निर्णय होणार की पुन्हा ठरणार फार्स, तक्रारदारांनी केला सवाल

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या तक्रारींवर तब्बल सात महिन्यांनी महापालिकेला सुनावणी घेण्यास वेळ मिळाला आहे. नगरसेवकांना वाचवण्यासाठी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत यात मोठा आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना, अशी शंका तक्रारदार घेत आहेत. शुक्रवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पालिकेत सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे यात तरी निर्णय लागेल का, असा सवाल तक्रारदार करत आहेत.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सात नगरसेवकांविरोधात बेकायदा बांधकाम, माहिती लपवणे आदी तक्रारी करत नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी तक्रारदारांनी चालवली आहे. भाजपाचे विजय राय, नीला सोन्स, परशुराम म्हात्रे व मेघना रावल या चौघांचा, तर शिवसेनेच्या अनिता पाटील, काँग्रेसचे नरेश पाटील व काँग्रेस समर्थक राजीव मेहरा अशा सात नगरसेवकांचा समावेश आहे.पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक म्हात्रे व नगरसेविका पाटील यांचे पद रद्द करण्यासाठी भरत मोकल यांनी ५ जुलै २०१६ रोजी तक्रार केली होती. दोन्ही नगरसेवकांवर उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु, नगरसेवकपद रद्द करण्यासाठीच्या सुनावणीची मात्र तारीख पे तारीख सुरू आहे. शेवटची सुनावणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी झाली होती. त्यात परशुराम यांनी लेखी उत्तर दिले, पण पाटील यांनी उत्तर दिले नव्हते.काँग्रेस समर्थक नगरसेवक मेहरा यांनी त्यांच्यावर दाखल गुन्हा लपवला म्हणून भाजपाचे पराभूत उमेदवार साजी आयपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार साबीर शेख यांनी तक्रारी केल्या आहेत. तर, काँग्रेसचे नरेश पाटील यांनी आपली जन्मतारीख चुकीची व शिक्षण सातवी असताना नववीपर्यंत झाल्याची चुकीची माहिती दिली असल्याने पद रद्द करा, अशी तक्रार भाजपाचे डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे. यातसुद्धा सात महिन्यांपूर्वी सुनावणी झाली होती व पाटील यांनी आपले म्हणणे सादर केले होते.भाजपा नगरसेविका मेघना रावल यांचे पती दीपक यांनी साईबाबानगर येथे बेकायदा बांधकाम केले म्हणून मेघना यांचे नगरसेवकपद रद्द करा, अशी तक्रार इरबा कोनापुरे यांनी २० नोव्हेंबर २०१७ रोजी केली आहे. पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगीही चुकीची असून बेकायदा बांधकामही तोडले नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांची शेवटची सुनावणीही ३ आॅगस्टला घेण्यात आली होती. भाजपा नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांचे मीरा रोडच्या कनकिया भागात कार्यालय, वाचनालयाचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली आहे. त्यांचीही सुनावणी सात महिन्यांपूर्वी पालिकेने घेतली होती.महापालिकेकडून सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यासह या सत्ताधारी नगरसेवकांवर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. यामागे राजकीय दबावासह आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आता येऊ लागला असल्याचा आरोप ब्रिजेश शर्मा यांनी केला आहे. २०१७ पासून तक्रार केली असताना बेकायदा बांधकामावर कारवाई केलेली नाही.बेकायदा बांधकामांवर कारवाईच नाहीजवळपास सात महिन्यांनी आयुक्तांनी सुनावणी ठेवली असून यावेळी तरी निर्णय देणार की, पुन्हा तारीख पे तारीख करत नगरसेवकांना पाठीशी घालणार, असा सवाल इरबा कोनापुरे यांनी केला आहे. तक्रारीतील बेकायदा बांधकामांवरही पालिकेने अजून कारवाई केली नसल्याचे कोनापुरे म्हणाले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक