शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:23 IST

हरिभाऊ राठोड यांचा आरोप; १५ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन

ठाणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार भाजप सरकारने राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बंजारा आरक्षण, क्रिमीलेअर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार अशा प्रलंबित प्रश्नांवर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी १५ आॅक्टोबरला राज्यभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, केंद्र सरकारने २0१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत घटनेच्या काही अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्यात आली. एसईबीसी घोषित करण्याचे राज्याचे अधिकार काढून संसदेला दिले. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीत घ्यायचे झाल्यास संसदेची मंजुरी लागणार आहे. वास्तविक, घटनेच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत विधेयक चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीसंदर्भात विचार झाला असता, तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.‘मी देणार फॉर्म्युला’भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले, तरी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठीचा फॉर्म्युला मी सरकारला देणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा