शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:23 IST

हरिभाऊ राठोड यांचा आरोप; १५ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन

ठाणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार भाजप सरकारने राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बंजारा आरक्षण, क्रिमीलेअर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार अशा प्रलंबित प्रश्नांवर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी १५ आॅक्टोबरला राज्यभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, केंद्र सरकारने २0१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत घटनेच्या काही अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्यात आली. एसईबीसी घोषित करण्याचे राज्याचे अधिकार काढून संसदेला दिले. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीत घ्यायचे झाल्यास संसदेची मंजुरी लागणार आहे. वास्तविक, घटनेच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत विधेयक चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीसंदर्भात विचार झाला असता, तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.‘मी देणार फॉर्म्युला’भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले, तरी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठीचा फॉर्म्युला मी सरकारला देणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा