शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

भाईंदरमध्ये ‘नेकी कि दिवार’; ‘द्या आणि घ्या’ ची संकल्पना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:58 IST

भाईंदर येथील स्थानिक रहिवासी प्रदीप धानुका यांनी भाईंदर पोलिसांच्या सहकार्याने नुकतीच ‘द्या आणि घ्या’ या तत्वावर आधारीत ‘नेकी कि दिवार’ संकल्पना सुरु केली आहे.

- राजू काळे  

भाईंदर - येथील स्थानिक रहिवासी प्रदीप धानुका यांनी भाईंदर पोलिसांच्या सहकार्याने नुकतीच ‘द्या आणि घ्या’ या तत्वावर आधारीत ‘नेकी कि दिवार’ संकल्पना सुरु केली आहे. या संकल्पनेनुसार ज्यांच्याकडे विनावापराच्या वस्तू आहेत ते त्या वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेवतील, ज्यांना त्या वस्तूची गरज आहे ते त्या वस्तू त्या ठिकाणाहूनच घेतील, असा कयास त्यामागे लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

राबविण्यात आलेली हि संकल्पना देशातील पहिलीच संकल्पना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते लायन्स क्लब ऑफ मीरा-भाईंदर गॅलेक्सीचे वरीष्ठ सदस्य असुन ते लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करीत असतात. या सततच्या मदतीला एक वेगळी जोड देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोळत होता. अखेर त्यांना इंग्रजी भाषेतील ‘गीव्ह अ‍ॅन्ड टेक’ हि संकल्पना आठवली. त्याच धर्तीवर त्यांनी ‘द्या आणि घ्या’ हि संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्याला माणूसकीची जोड देत नेकी कि दिवार, असे गोंडस नाव देण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यासाठी पुरेशी व लोकांच्या नजरेत चटकन येणाऱ्या जागेची अडचण त्यांच्यापुढे उभी राहिली. ती जागा त्यांना भाईंदर पोलिस ठाण्याच्या आवारात आढळून आली. मात्र त्यासाठी पोलिस सहकार्य करतील का, असा प्रश्न देखील त्यांच्या मनात आला. मग त्यांनी थेट भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अतुल कूळकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्यापुढे ‘द्या आणि घ्या’ ची संकल्पना मांडली. ती कूळकर्णी यांना पटल्याने त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यातील मुख्य रस्त्याच्या बाजुुला असलेल्या एका कोपऱ्यातील भिंतीवर लाकडी कपाट बसविण्यास धानुका यांना संमती दिली. धानुका यांनी तेथे सुमारे १० फूट उंच व ५ फूट रुंदीचे तीन खणांचे लाकडी कपाट नुकतेच बसविले. त्या ‘नेकी कि दिवार’ द्वारे ज्यांच्याकडे विनावापराच्या वस्तू आहेत अथवा अडगळीतील वस्तू ज्यांना नको असल्यास त्यांनी त्या वस्तू त्या लाकडी कपाटात आणून ठेवायच्या. त्यातील गरजेच्या वस्तू ज्यांना आवश्यक आहे त्यांनी त्या तेथून घेऊन जायच्या, असे आवाहन त्यांनी केले. त्याला दोन दिवसांपुर्वीच सुरुवात करण्यात आली असुन  लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे धानुका यांच्याकडून सांगण्यात आले. हि संकल्पना देशातील पहिली संकल्पना ठरली असुन अनेक लोकं विनावापरातील वस्तू टाकून देतात अथवा त्या भंगारात टाकतात. काहीजण त्या गरीबांना देतात. परंतु, जुने साहित्य अनेक लोकं पुन्हा दुरुस्त करुन अल्प दरात विकतात. त्यामुळे विनावापराच्या वस्तू ज्यांना भंगारात विकायच्या नसल्यास त्यांनी त्या ‘नेकी कि दिवार’ मध्ये ठेवाव्यात, असे आवाहन करुन ज्यांना त्या वस्तूची गरज भासल्यास ते त्या वस्तू विनामुल्य घेऊन जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक लोकांच्या गरजा विनावापराच्या वस्तूंद्वारे पुर्ण होऊ शकतील, असा दावा त्यांनी केला आहे. शहरातील आणखी काही ठिकाणी हि संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर