शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या कौस्तुभ तारमाळेला मरणोत्तर सर्वोत्तम जीवनरक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 2:31 AM

भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली.

ठाणे : पाण्यात बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचवताना कौस्तुभ भगवान तारमाळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्यास केंद्र शासनाचे ‘सर्वोत्तम जीवनरक्षापदक’ मरणोत्तर जाहीर झाले होते. हे पदक त्याची आई रत्नप्रभा तारमाळे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व कुटुंबकल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानपत्र, पदक व दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. १२ मे २०१८ रोजी खडवली (कासणे) येथील भातसा नदीत पोहण्यासाठी सात मुले खोल गेली होती. भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली. हे भातसा नदीच्या किनाºयावर उभ्या असलेल्या कौस्तुभ (२४ रा. मौजे-शेई, ता. शहापूर) याने पाहिले व क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, बुडणाऱ्या मुलांना वाचवताना शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे कौस्तुभ यांचा मृत्यू झाला होता.

या पुरस्कारावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, आमदार गणपत गायकवाड, जिल्हा पालक सचिव सतीश गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी अंकुश माने उपस्थित होते. याप्रकरणी कौस्तुभ तारमाळे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी केंद्र शासनाच्या जीवनरक्षापदक पुरस्कार २०१८ साठी त्यांचा प्रस्ताव विहित नमुन्यात गृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडील पत्रान्वये कौस्तुभ याची २०१८ साठी जीवनरक्षापदक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या आईस प्रदान करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे