शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:47 IST

कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे  जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकोमसापच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी स्पर्धा विजेत्यांना रोख पारितोषिक, पुस्तकभेट, प्रमाणपत्र

ठाणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणदिनाचे औचित्य साधून  कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती मुंबई - ठाणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई, ठाणे  जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन या दोन स्पर्धां आयजित करण्यात येत आहे. 

यातील वक्तृत्व स्पर्धा दिनांक २२ ऑगस्ट रोजी एम एच हायस्कूल , ठाणे येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे अशी माहिती कोमसापने दिली. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, पुस्तकभेट, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती कोमसापच्या प्रा. दीपा ठाणेकर यांनी दिली. स्पर्धेचे नियम आणि तपशील माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाट्सअप वरून संपर्क साधावा असे आवाहन  कोमसापने केले आहे. 

वक्तृत्व स्पर्धा - गट १ -  ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 

१ -  सारे भारतीय माझे बांधव आहेत ?  

२ -  मालिकांमधील दाखवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि समाज  

३ -  स्मार्ट फोनच्या जमान्यात माणसं विचारांनी स्मार्ट झालीत का ? 

४ -  आवरा त्या प्लास्टिकच्या विळख्याला. 

५ -  आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाची गरज.   

संपर्क क्रमांक - ९८७०५ ८८६८२  

वक्तृत्व स्पर्धा - गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल 

वा अन्य शाखा BMS BMM )

 १)   डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी  भारतीय समाजासाठी दिलेले योगदान

२)   डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा 

३ )  कधी साकारेल का आरक्षण विरहित भारत ?  

४)   जातीसाठी घालवावा का जीव आपला ? 

५)   होय , भावना डिजिटल होतायत..

संपर्क क्रमांक - ८८९८५ ५३४९५ 

 

संवाद लेखन स्पर्धा : गट १ == ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट - इयत्ता -  नववी ते बारावी ) 

१ -   जातीविरहित भारत  याबाबत  भारतमाता आणि भारतीय नागरिक यांच्यातील संवाद 

२ -   कोणत्याही प्रवेश अर्जामध्ये  जात धर्म याबाबत होणा-या उल्लेखाबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद

३ -   गावातील बळी प्रकार थांबविण्याबाबत गावातील प्रतिष्ठित मांत्रिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांच्यातील संवाद. 

४ -   प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक - नकारात्मक विचार करणाऱ्या तरुणांतील संवाद. 

५ -   व्हाटसपवर येणाऱ्या संदेशापाठीमागे असणारी प्रचंड कल्पनाशक्ती याबाबत मित्र मैत्रिणींमधील संवाद. 

संपर्कक्रमांक   -  ७७३८९ ५४७०८ 

संवाद लेखन स्पर्धा  =  गट २ - ( पदवी गट  - प्रथम वर्ष  ते तृतीय वर्ष कला , वाणिज्य , विज्ञान , अभियांत्रिकी, मेडिकल वा अन्य शाखा BMS BMM )

१)   देशाच्या अस्थिरतेबद्दल लढवय्या सैनिक आणि बळीराजा यांच्यातील संवाद.  

२ )  समाजाला पोखरणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संवाद.

३)   आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांंबाबत शिवाजी महाराज आणि मावळे यांच्यातील संवाद. 

४)   ढोलताशे बडवणारी संस्कृती निर्माण होतेय याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि युवावर्गाशी संवाद. 

५)   करिअरच्या वाटेवर शिक्षण मूल्यांचा अभाव असलेली पिढी जन्माला येतेय याबाबत समाजसुधारकांचा तरुणांशी झालेला संवाद . 

संपर्क क्रमांक - ८१०८२ ४७०७४ 

स्पर्धेचे  नियम : 

वक्तृत्व स्पर्धेसाठी नियम : 

१ -  कोणत्याही स्पर्धेत एका शाळेचे वा महाविद्यालयाचे २ स्पर्धक असावेत.  

२ -  वक्तृत्व स्पर्धेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी ५ मिनिटे तर पदवीसाठी ७ मिनिटांचा कालावधी आहे..

३ -  स्पर्धेच्या वेळी स्पर्धकाकडे शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक आहे. 

४ -  स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपली नावे - 

माध्यमिक - उच्च माध्यमिकगटासाठी ( शुभांगी विरकर -९८७०५ ८८६८२ ) 

पदवीगटासाठी ( कमलेश भिसे ८८९८५ ५३४९५ ) 

यांच्याकडे व्हाटसपवर २० ऑगस्ट पर्यंत द्यावीत. त्यानंतर नावनोंदणी करायची असल्यास याच समन्वयकांशी संपर्क साधावा. 

संवाद लेखनासाठी नियम : 

१ - संवाद लेखन इमेल वर पाठवायचे आहे -  

वैभव   मेल आणि नंबर - ७७३८९ ५४७०८   vpadave7@gmail.com   

रुपाली  मेल आणि नंबर - ८१०८२ ४७०७४  rupalipinjan@gmail.com  

२ -  मेलवर संवादलेखन पाठवताना ते टाईप केलेले असले तर उत्तम... पण त्यासोबत font ही पाठवावा.

३ -  जर टाईप करुन पाठवता येणे शक्य नसेल तर उत्तम हस्ताक्षरात कागदावर लिहून त्याचा क्लिअर फोटो पाठवावा.

४ -  संवादलेखन करताना चार पेक्षा जास्त पात्र नसावीत.

५ -  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यासाठी २०-२५ संवाद असावेत.

तर पदवीगटासाठी ३०-३५ संवाद असावेत. साधारण ३-४ फुलस्केप असावेत. 

६ -  संवाद पाठविण्याची अंतिम तारीख १८ आँगस्ट आहे.. त्यानंतर पाठवायचे असल्यास संबंधित समन्वयकाशी संपर्क साधावा.

७-   संवादलेखन पाठवताना त्यासोबत विद्यार्थ्याचे नाव , पत्ता, शाळा / महाविद्यालयाचे नाव, वर्ष, इयत्ता, संपर्क नंबर , पाठवणे अत्यावश्यक आहे..

८-   काही शंका असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा किंवाdeepathanekar73@gmail.com या मेलवर शंका विचाराव्यात. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई