शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

जिल्हा रुग्णालयाच्या शवागार यंत्रणेच्या कामाला अखेर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:54 PM

जिल्हा रुग्णालयाच्या शवागारामधील मृतदेहांची संख्या वाढल्याने तेथील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली.

ठाणे : जिल्हा रुग्णालयाच्या शवागारामधील मृतदेहांची संख्या वाढल्याने तेथील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर दोन दिवसांत येथील मृतदेह संबंधित यंत्रणांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने ती संख्या मंगळवारी दुपारपर्यंत ५ वर आली. त्यामुळे तेथील वातानुकूलित यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली. यापुढे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह ७ दिवसात ताब्यात घ्यावे, अन्यथा दुसरे मृतदेह न घेण्याचा पवित्रा ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा रुग्णालय शवागारात मृतदेह ठेवण्याची क्षमता सध्याच्या घडीला अवघी १२ इतकी आहे. येथे ठाणे ग्रामीण, पालघर तसेच शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून मृतदेह आणले जातात. त्यातच मध्यंतरी काही यंत्रणांनी मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे मृतदेहांची संख्या दुप्पट, तिप्पटवर गेली. या वाढत्या मृतदेहांचा परिणाम वातानुकूलित यंत्रणेवर होऊन यंत्रणा अचानक ठप्प पडली. शवागारात थंडावा राखण्यासाठी अद्याप बर्फांच्या लाद्यांचा वापर केला जात आहे. जोपर्यंत शवागारातील मृतदेह जात नाहीत, तोपर्यंत तिथे दुरूस्तीचे काम करता येण्यासारखे नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पोलीस यंत्रणेच्या मागे लागून ते मृतदेह ताब्यात देण्यास सुरुवात केली.>५ ते ७ दिवसांत मृतदेह हलवाभविष्यात पुन्हा असे संकट ओढवू नये, यासाठी वातानुकूलित यंत्रणेची नवीनच कॉइल टाकावी, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाने केली. शवागारात मृतदेह ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शवविच्छेदनानंतर एखादा मृतदेह कमीत कमी ५ ते ७ दिवसांत घेऊन जाण्याबाबत संबंधितांना सूचना करणार आहेत. संबंधित यंत्रणांनी सहकार्य केले नाही तर, जोपर्यंत पहिला मृतदेह नेला जात नाही, तोपर्यंत त्या संबंधित यंत्रणेकडून दुसरा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेण्याचा विचार रुग्णालय प्रशासन करीत आहे. या बाबत आताच कठोर पावले उचलण्याची वेळ आल्याचेही सूत्रांनी सांगितले.