शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:06 IST

भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे.

राजू काळेभार्इंदर - भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्यासह पालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्या परिसराची पाहणी केली.या नियोजित सुशोभिकरणासाठी आ. मेहता यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारकडून २ कोटींचा विशेष निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेला भव्य एकमजली प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची लांबी २२० फूट तर रुंदी ३० फूट इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मेहता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.या नियोजित प्रवेशद्वारामुळे रेल्वे परिसराचा लूक बदलणार असला तरी तेथील रिक्षास्टॅन्ड, बस थांबे, त्यांच्यासह खासगी वाहतुकीची रेलचेल, लगतच्या मासळी बाजार व लोकवस्तीतील रहिवाशांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतुक कोंडी त्यामुळे सुटणार का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडुन उपस्थित होऊ लागला आहे. यात प्रामुख्याने म्हणजे नियोजित प्रवेशद्वाराची जागा रेल्वेच्या मालकीची असुन रेल्वे प्रशासन त्याच्या बांधकामाला सहज परवानगी देईल का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वीच रेल्वे मार्गाखालून बांधलेल्या भुयारी मार्गाच्या परवानगीपोटी रेल्वे प्रशासनाने पालिकेकडून कोट्यवधींचे शुल्क वसूल केले आहे. त्यामुळे या नियोजित प्रवेशद्वाराच्या परवानगीसाठी देखील रेल्वेकडून विविध शुल्काची मागणी केली जाऊ शकते, असा कयास प्रशासनाकडून लावला जात आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार अत्यावश्यक नसल्याचा सूर नागरिकांकडून आळवला जात आहे.एका बाजूला शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित तसेच सरकारी लालफितीत अडकली असताना केवळ रेल्वे परिसराचे सुशोभीकरण करण्याचा सपाटा लावण्यात आर्थिक नुकसान करण्यासारखे असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा रोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे डोहाळे सत्ताधा-यांना लागल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु या स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाले, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते व पर्यायी रस्त्यांचा अभाव आदी समस्या जैसे थे असताना केवळ परिसराचे सुशोभीकरण करून शहराचा विकास काय कामाचा? असा दावा केला जात असला तरी शहरातील सौंदर्यात मात्र नियोजित सुशोभीकरणामुळे भर पडणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर