शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रेल्वे उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:11 IST

भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये युतीचा पूल उभारण्याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न

डोंबिवली : भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये युतीचा पूल उभारण्याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरु झाले असतानाच डोंबिवलीत मात्र पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ््यावरुन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात श्रेयवादाची लढाई उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे व महापालिकेने पुढाकार घेऊन स. वा. जोशी व ठाकूर्ली ५२ चाळ या दोन्ही भागाकडे उतरणारा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याचे काम हाती घेतले. डोंबिवलीचा कोपर पूल हा जुना झाला असून तो अरुंद आहे. त्यामुळे कोपर पुलास पर्याय प्राप्त होणार आहे. १२ कोटी रुपये खर्च करुन १७० टन वजनाचे दोन गर्डर सप्टेंबर २०१७ मध्ये टाकण्यात आले. गर्डर टाकण्याचा खर्च महापालिका व रेल्वे यांनी निम्मानिम्मा केला. हा पूल २०१७ च्या दिवाळीत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सूतोवाच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या कामाची चव्हाण व खा. शिंदे यांनी पाहणी केली होती. ठाकूर्लीच्या बाजूने व स.वा. जोशी शाळेच्या बाजेने पोहच रस्ता तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिल महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाण्याचे सांगण्यात येते. मात्र उदघाटनाची तारीख नक्की केली जात नाही. कारण पुलासाठी चव्हाण व शिंदे यांनी दोघांनी प्रयत्न केल्याने कामाच्या श्रेयाची लढाई रंगण्याची दाट चिन्हे आहेत.पूलावर दोन गर्डर असून एक मार्ग पूर्वेकडे जाण्यासाठी व एक पश्चिमेकडे येण्यासाठी आहे. मात्र दोन्ही गर्डरची रुंदी अरुंद असल्याने त्यावरुन बसगाड्यांची वाहतूक होणार किंवा कसे अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुलावरुन बसगाड्या जाण्यात अडथळा येणार असेल तर पूल उभारुनही उपयोग होणार नाही. पुलावरुन केवळ दुचाकी, तीनचाकी वाहने मार्गक्रमण करु शकतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ज्याला डोंबिवली पश्चिमेत नव्या रेल्वे उड्डाणपूलावरुन जायचे झाल्यास त्याला ठाकूर्ली व गणेश मंदिरच्या येथून पूलावरुन जावे लागेल तर ठाकुर्ली व डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेत जाण्यासाठी स. वा. जोशी शाळेच्या पुढून गणेश मंदिर मार्गे बाहेर पडावे लागणार आहे. परिणामी नवा रेल्वे उड्डाणपूल हा वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी कोंडीत भर घालणारा ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीचा ताण नव्या रेल्वे उड्डाणपूलावर जाईल. त्यामुळे गणेश मंदिर परिसर व ठाकूर्ली समांतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील बाजू तसेच पुढे समांतर रस्त्याकडे जाताना अरुंद चौकात वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.यापूर्वीही महापालिकेने कल्याण आग्रा रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गोविंदवाडी बायपास तयार केला. गोविंदवाडी बायपासमुळे कल्याण पत्री पूलावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीचे नवे जंक्शन कल्याण पत्री पूल येथे तयार झाले आहे. त्याचबरोबर कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान एफ केबीनवरील रेल्वे उड्डाणपुलामुळे कल्याण उल्हासनगरला जोडणाºया रेल्वे उड्डाण पूल वाहतूककोंडीचे जंक्शन झाला आहे.