शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई; वाहनचालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 04:03 IST

शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादीत पत्रकबाजी

ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरु स्तीमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर तातडीचा उपाय म्हणून ऐरोली तसेच मुलुंडचे दोन्ही टोलनाके २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हलक्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. परंतु, आता टोलमाफी नेमकी झाली कोणामुळे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. राष्टÑवादीसह भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे हे याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले असून आता शिवसेनेनेही टोलमाफीचे श्रेय घेतले आहे. या तीनही आघाडीच्या पक्षांमध्ये टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरू असल्याने नवी मुंबईकडून येणारी सर्व वाहने ऐरोलीमार्गे मुलुंडहून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गाने नाशिक आणि अहमदाबादच्या दिशेने जात आहेत, या दोन ठिकाणांहून येणारी वाहतूकही याचमार्गे नवी मुंबईला जात असल्याने ठाण्यातील रस्त्यांवर आणि विशेषत: टोलनाक्यांवर मोठी वाहतूककोंडी होत आहे. मुंब्रा बायपास १० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काही दिवसांपूर्वी दिले. मात्र, तातडीचा उपाय म्हणून मुलुंडचे दोन्ही टोलनाके आणि ऐरोली अशा तीन टोलनाक्यांवर हलक्या वाहनांची टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मागील काही दिवसांत जोर धरत होती. यासाठी सुरुवातीला भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर, लागलीच दोन ते तीन दिवसांच्या फरकाने हीच मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.दरम्यान, वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी टोलमुक्ती आंदोलनाचा इशारा रविवारी दिला होता. परंतु, त्याआधीच दोन्ही टोलनाक्यांवर गणेशोत्सवापर्यंत टोल बंद राहील, असे आदेश एमएसआरडीसीने दिले असून, त्यामुळे एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा असल्याचे पत्रक राष्टÑवादीने काढले. त्यानंतर, सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दोन्ही टोलनाक्यांवर एक महिना हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर लागलीच भाजपाचे राज्यसभेचे खासदार सहस्रबुद्धे यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहारामुळेच टोलमुक्ती मिळाल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे राष्टÑवादीने आधीच श्रेय घेतल्याने शिल्लक राहिलेल्या शिवसेनेनेसुद्धा टोलमाफीची घोषणा केली.वास्तविक पाहता एमएसआरडीसीचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानासुद्धा भाजपाने टोलमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने प्रसिद्धिपत्रक काढण्यापूर्वीच भाजपाने प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा