शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई; वाहनचालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 04:03 IST

शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादीत पत्रकबाजी

ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरु स्तीमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर तातडीचा उपाय म्हणून ऐरोली तसेच मुलुंडचे दोन्ही टोलनाके २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हलक्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. परंतु, आता टोलमाफी नेमकी झाली कोणामुळे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. राष्टÑवादीसह भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे हे याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले असून आता शिवसेनेनेही टोलमाफीचे श्रेय घेतले आहे. या तीनही आघाडीच्या पक्षांमध्ये टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरू असल्याने नवी मुंबईकडून येणारी सर्व वाहने ऐरोलीमार्गे मुलुंडहून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गाने नाशिक आणि अहमदाबादच्या दिशेने जात आहेत, या दोन ठिकाणांहून येणारी वाहतूकही याचमार्गे नवी मुंबईला जात असल्याने ठाण्यातील रस्त्यांवर आणि विशेषत: टोलनाक्यांवर मोठी वाहतूककोंडी होत आहे. मुंब्रा बायपास १० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काही दिवसांपूर्वी दिले. मात्र, तातडीचा उपाय म्हणून मुलुंडचे दोन्ही टोलनाके आणि ऐरोली अशा तीन टोलनाक्यांवर हलक्या वाहनांची टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मागील काही दिवसांत जोर धरत होती. यासाठी सुरुवातीला भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर, लागलीच दोन ते तीन दिवसांच्या फरकाने हीच मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.दरम्यान, वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी टोलमुक्ती आंदोलनाचा इशारा रविवारी दिला होता. परंतु, त्याआधीच दोन्ही टोलनाक्यांवर गणेशोत्सवापर्यंत टोल बंद राहील, असे आदेश एमएसआरडीसीने दिले असून, त्यामुळे एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा असल्याचे पत्रक राष्टÑवादीने काढले. त्यानंतर, सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दोन्ही टोलनाक्यांवर एक महिना हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर लागलीच भाजपाचे राज्यसभेचे खासदार सहस्रबुद्धे यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहारामुळेच टोलमुक्ती मिळाल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे राष्टÑवादीने आधीच श्रेय घेतल्याने शिल्लक राहिलेल्या शिवसेनेनेसुद्धा टोलमाफीची घोषणा केली.वास्तविक पाहता एमएसआरडीसीचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानासुद्धा भाजपाने टोलमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने प्रसिद्धिपत्रक काढण्यापूर्वीच भाजपाने प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा