शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:48 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच साठा, पाणी जपून वारण्याचे आवाहन

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरवणे शक्य होईल, असे नियोजन केले जात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच एमआयडीसीच्या मंजूर पाणीकोट्यातील पाणी हे अंबरनाथ पूर्व भागासाठी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अंबरनाथ शहराला उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलोली धरणातील सहा दशलक्ष लीटर पाणी दररोज पूर्व भागात वितरित करण्यात येत आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने आणि पाण्याची पातळी जास्त खालवत चालल्याने या धरणातील पाणीसाठा जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मिळणाºया पाण्यावर जास्त भर दिला जात आहे. चिखलोली धरणाची पातळी ही खालावत असल्याने या पाण्यावर जास्त दिवस अवलंबून राहणे शक्य होणार नाही. त्यातच, गेल्या वर्षीप्रमाणे पाण्यात रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्यास ऐन मे महिन्यात नागरिकांची पाण्यामुळे कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांसाठी एमआयडीसीचे पाणी घेतले जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने आतापासूनच सुरू ठेवले आहे. पाण्यामध्ये रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्याने गेल्या वर्षी या धरणातील पाणी न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यंदा एमआयडीसी भागातील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. मात्र, तरीही धरणातील पाणी दूषित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. धरणाची पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खालावल्याने या पाण्याचेही नियोजन करूनच आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई