शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:48 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच साठा, पाणी जपून वारण्याचे आवाहन

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरवणे शक्य होईल, असे नियोजन केले जात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच एमआयडीसीच्या मंजूर पाणीकोट्यातील पाणी हे अंबरनाथ पूर्व भागासाठी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अंबरनाथ शहराला उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलोली धरणातील सहा दशलक्ष लीटर पाणी दररोज पूर्व भागात वितरित करण्यात येत आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने आणि पाण्याची पातळी जास्त खालवत चालल्याने या धरणातील पाणीसाठा जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मिळणाºया पाण्यावर जास्त भर दिला जात आहे. चिखलोली धरणाची पातळी ही खालावत असल्याने या पाण्यावर जास्त दिवस अवलंबून राहणे शक्य होणार नाही. त्यातच, गेल्या वर्षीप्रमाणे पाण्यात रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्यास ऐन मे महिन्यात नागरिकांची पाण्यामुळे कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांसाठी एमआयडीसीचे पाणी घेतले जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने आतापासूनच सुरू ठेवले आहे. पाण्यामध्ये रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्याने गेल्या वर्षी या धरणातील पाणी न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यंदा एमआयडीसी भागातील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. मात्र, तरीही धरणातील पाणी दूषित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. धरणाची पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खालावल्याने या पाण्याचेही नियोजन करूनच आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई