शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’बाधित काळे - वडखळच्या ग्रामस्थांची न्यायालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:27 IST

एका आठवड्यात म्हणणे मांडा । एमआयडीसीला आदेश

सुरेश लोखंडे

ठाणे : बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अडकलेल्या मुरबाड तालुक्यातील काळे वडखळ, तळ्याचीवाडी येथील गांवकऱ्यांचे पुनर्वसन या वर्षीही झाले नाही. त्यामुळे जलसमाधी मिळण्याच्या भीतीने या गांवकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अखेर धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन एमआयडीसीला एक आठवड्यात म्हणणे मांडण्याची तंबी न्यायालयाने दिली असल्याची माहिती श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिली.

'बारवीच्या जलसमाधीतून वाचवण्यासाठी काळे वडखळच्या ग्रामस्थांचा टाहो ! ' या मथळ्याखाली लोकमतने २५ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते जिल्ह्यातील महापालिका,नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा करणाºया या धरणाच्या पाणलोटात ही तीन गांवपाडे आहे. या धरणाची उंची वाढवल्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात त्यांच्या चोहोबाजूने पाणी होते. त्यावेळी येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहिले. रस्तेही पाण्याखाली गेल्याने या ग्रामस्थांना पाण्याबाहेर येणेही शक्य नव्हते. त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी अन्यत्र पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी वर्षेभर पाठपुरावा करूनही एमआयडीसीने केवळ आश्वासने दिली. मात्र, अजूनही ते केले नाही. या मनमानीविरोधात गांवकºयांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून तीवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत म्हणणे मांडण्यासाठी एमआयडीसीने दोन आठवड्याची मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने एक आठवड्याची मुदत देऊन येत्या शुक्रवारी सुनावणीला हजर होण्याचे आदेश दिले, असे तुळपुळे यांनी निदर्शनात आणून दिले.येत्या शुक्रवारी पुन्हा सुणावणीएमआयडीसीच्या मालकीच्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ही बाधीत गांवखेडी कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहतात. आता धरणाची उंची वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात धरणात साठा वाढून या गांवपाड्यांमध्ये पाणी शिरले होते. यावर मात करण्यासाठी पुनर्वसन करणे अपेक्षित होते. मात्र, एमआयडीसीने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याविरोधात आता न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्या शुक्रवारी त्यावर पुन्हा सुनावणी आहे.पाच खेड्यांचे गेल्या वर्षी केले पुनर्वसनग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्यामुळे त्यांच्यावर जलसमाधीची टांगती तलवार आहे. बारवी धरणाच्या या पाणलोटक्षेत्रात सात गांवखेड्यांचा समावेश होता. यापैकी पाच गांवखेड्यांचे गेल्या वर्षी पुनर्वसन झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय