शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील बँकांनी एटीएमसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख सांभाळावी - विजयसिंग पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:25 IST

डोंबिवली शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे.

ठळक मुद्दे बँक अधिका-यांसह पोलिसांची बैठक संपन्नरामनगर पोलिस ठाण्यात मॅरेथॉन चर्चा

डोंबिवली: शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत कानाडोळा करु नका, घटना घडून गेल्यावर सतर्क होण्यापेक्षा आधीच सतर्क असावे, असे आवाहन रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनी बँक अधिका-यांना केले.शहरातील विविध बँकांच्या खात्यांमधून ग्राहकांचे पैसे आपोआप वळती झाले. अशा सुमारे ३० हून अधिक घटना घडल्या असून लाखो रुपये परस्पर वटवले गेल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली असून आता खातीही सुरक्षित नसल्याचे नीदर्शनास आल्याने पोलिसांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व राष्ट्रियीकृत बँका, खासगी बँकांचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी सर्व अधिका-यांना सांगितले की, जेवढी जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे तेवढीच बँक अधिकारी म्हणुन त्यांचीही आहे, खात्यांमधून पैसे आपोआप वळती व्हायला लागले तर मात्र गंभीर स्थिती असून वेळीच त्यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे अन्यथा मोठी आपत्ती ओढावू शकते. एकापाठोपाठ एक अशा घटना होत आहेत, पण तरीही बँका स्वस्थ कशा बसू शकतात, सुरक्षिततेविषयी कोणालाही गांभिर्य का नाही. आज ग्राहकांचा पैसा जात आहे, त्यात आपलेही कुटुंबिय असू शकतात. त्यांच्या मानसीकतेचा विचार करावा आणि योग्य ती खबरदारीची पावले तातडीने उचलावीत असेही आवाहन त्यांनी केले. पोलिस उपनिरिक्षक सुनिल खैरनार, बालाजी शिंदे आदींनी ही बैठक आयोजित केली होती.एटीएममध्ये प्रामुख्याने लक्ष द्यावे, जेणेकरुन डेटाचोरीसारख्या घटनांना प्रतिबंध घालता येईल. एटीएममध्ये हेल्मेट घालणे, रुमाल बांधणे, डोक्यावर, डोळयावर गॉगल लावणे, यासह मास्क लावणे असे कोणीही आढळल्यास त्यास तातडीने हटकावे, उघड्या डोक्यासह चेह-याने प्रवेश द्यावा. तसेच एटीएम जवळ कोणी सातत्याने फे-या मारत असेल घुटमळत असेल, बराच वेळ थांबत असेल तर अशांनाही हटका, त्यांची विचारपूस करा, संशयित वाटल्यास तातडीने पोलिसांना सतर्क करा असेही ते म्हणाले. अलार्म योग्य नसणे ही धोक्याची घंटा असून ते योग्य नाहीच. सर्व बॅकांनी तातडीने अलार्म टेस्ट करावेत ते वाजत आहेत की नाहीत हे बघावे आणि त्याप्रमाणे पोलिसांना सूचित करावे. तसेच ज्यांच्याकडे ही यंत्रणा कार्यान्वित नाही, त्यांनी तातडीने ते बसवावे. ग्राहक हित लक्षात घेऊन पावले उचलावीत. त्यावर बँक अधिका-यांनी पोलिस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे सांगत अशा बैठका वारंवार होणे अपेक्षित असल्याचे म्हंटले. त्यानूसार तीन महिन्यातून संवाद बैठक घेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीbankबँकPoliceपोलिस