शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत; पेरलेले पीक वाया जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:09 IST

जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरांतील शेतकरी धास्तावले

जव्हार : जून महिना संपत आला तरी पाऊस पाहिजे तसा पडलेला नाही. दडी मारलेल्या पावसामुळे सुरुवातीला लागवड केलेले पीक मरते की काय, अशा चिंतेत बळीराजा सापडला आहे.

जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके ९९ टक्के आदिवासीबहुल आहेत. येथील आदिवासींचा मुख्य रोजगार म्हणजे शेती, त्यामुळे सर्व खेडोपाड्यात आदिवासी बांधव शेती करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भात, नागली, तुरी, वरी, उडीद, भुईमूग, हळद यासारखी महागडी बि-बियाणे घेऊन लागवड केली. त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील गरीब आदिवासी जनतेने जीवाचा आटापिटा करीत नांगरणी केली, पेरण्या केल्या, रोजंदारीवर मजूर बोलावले, मात्र गेल्या २२ ते २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे काही संघटनांनी भरपाई मिळण्याकरिता मागणी करणार असल्याचे सांगितले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा हा मागासलेला व डोंगराळ भाग आहे. येथील मजुरांना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर व्हावे लागते. येथील शेती ही कोरडवाहू असून फक्त पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी