शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:14 IST

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला.

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. त्यामुळे संतापलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांचा निषेध केला. अखेर रिक्षाचालकांनी बंद पुकारत थांबा रिकामा केला. मात्र स्थानक परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते.बदलापूर पूर्वेतील अंबिका हॉटेल आणि संजीवनी सभागृहापर्यंतच्या बेकायदा रिक्षाथांब्याच्या विरूद्ध स्थानक परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना सावध झाल्या होत्या. वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी ठोस निर्णय घेत रिक्षा संघटनांशी चर्चा केली होती. पंधरा दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मंगळवारी उशिरा स्थानक परिसरातील हा बेकायदा थांबा हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नगरसेवक संजय भोईर, राजन घोरपडे ाणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या उपस्थितीत रिक्षाथांबा हटवण्यात आला. मात्र काही मोजक्या मुजोर रिक्षाचालकांनी या निर्णयाविरूद्ध रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अवघ्या एका तासातच पूर्वीच्याच ठिकाणी रिक्षा लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी समन्वयाची भूमिका बजावणाºया पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. नगराध्यक्षा विजया राऊत, सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी नगरसेवक भोईर यांना सोबत घेऊन चर्चेला सुरूवात केली. मात्र सकाळी झालेला निर्णय पुन्हा कसा बदलू शकतो, असा ठाम पवित्रा घेत भोईर आणि रहिवाशांनी ठिय्या कायम ठेवला. तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षाथांबा हटवल्यानंतर पुन्हा तो तासाभरात कसा येऊ शकतो, असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने स्थानक परिसरात राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली.प्रवाशांना रिक्षातून उतरवले- दरम्यान, याचकाळात शहरात व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांना काही मुजोर रिक्षाचालक वाहतूक बंद करण्यासाठी धाक दाखवत होते. त्यामुळे तीनच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी रिक्षा थांबा हटवण्याच्या आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.- मात्र रिक्षाथांबा पुन्हा आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान, या काळात प्रवासी घेऊन जाणाºया रिक्षाचालकांना अडवून प्रवासी उतरवून देण्याचे प्रकार समोर आले.- यामुळे नागरिक संतापले होते. वाहतूक कोंडी आणि मुजोर रिक्षाचालकांचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच आंदोलन चिघळत असताना तिथे हजर असलेल्या सहायक आयुक्तांनी यावर ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. या विषयावर बोलणे टाळले.

टॅग्स :badlapurबदलापूरnewsबातम्या