शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:14 IST

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला.

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. त्यामुळे संतापलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांचा निषेध केला. अखेर रिक्षाचालकांनी बंद पुकारत थांबा रिकामा केला. मात्र स्थानक परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते.बदलापूर पूर्वेतील अंबिका हॉटेल आणि संजीवनी सभागृहापर्यंतच्या बेकायदा रिक्षाथांब्याच्या विरूद्ध स्थानक परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना सावध झाल्या होत्या. वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी ठोस निर्णय घेत रिक्षा संघटनांशी चर्चा केली होती. पंधरा दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मंगळवारी उशिरा स्थानक परिसरातील हा बेकायदा थांबा हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नगरसेवक संजय भोईर, राजन घोरपडे ाणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या उपस्थितीत रिक्षाथांबा हटवण्यात आला. मात्र काही मोजक्या मुजोर रिक्षाचालकांनी या निर्णयाविरूद्ध रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अवघ्या एका तासातच पूर्वीच्याच ठिकाणी रिक्षा लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी समन्वयाची भूमिका बजावणाºया पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. नगराध्यक्षा विजया राऊत, सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी नगरसेवक भोईर यांना सोबत घेऊन चर्चेला सुरूवात केली. मात्र सकाळी झालेला निर्णय पुन्हा कसा बदलू शकतो, असा ठाम पवित्रा घेत भोईर आणि रहिवाशांनी ठिय्या कायम ठेवला. तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षाथांबा हटवल्यानंतर पुन्हा तो तासाभरात कसा येऊ शकतो, असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने स्थानक परिसरात राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली.प्रवाशांना रिक्षातून उतरवले- दरम्यान, याचकाळात शहरात व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांना काही मुजोर रिक्षाचालक वाहतूक बंद करण्यासाठी धाक दाखवत होते. त्यामुळे तीनच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी रिक्षा थांबा हटवण्याच्या आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.- मात्र रिक्षाथांबा पुन्हा आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान, या काळात प्रवासी घेऊन जाणाºया रिक्षाचालकांना अडवून प्रवासी उतरवून देण्याचे प्रकार समोर आले.- यामुळे नागरिक संतापले होते. वाहतूक कोंडी आणि मुजोर रिक्षाचालकांचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच आंदोलन चिघळत असताना तिथे हजर असलेल्या सहायक आयुक्तांनी यावर ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. या विषयावर बोलणे टाळले.

टॅग्स :badlapurबदलापूरnewsबातम्या