शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:14 IST

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला.

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. त्यामुळे संतापलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांचा निषेध केला. अखेर रिक्षाचालकांनी बंद पुकारत थांबा रिकामा केला. मात्र स्थानक परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते.बदलापूर पूर्वेतील अंबिका हॉटेल आणि संजीवनी सभागृहापर्यंतच्या बेकायदा रिक्षाथांब्याच्या विरूद्ध स्थानक परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना सावध झाल्या होत्या. वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी ठोस निर्णय घेत रिक्षा संघटनांशी चर्चा केली होती. पंधरा दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मंगळवारी उशिरा स्थानक परिसरातील हा बेकायदा थांबा हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नगरसेवक संजय भोईर, राजन घोरपडे ाणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या उपस्थितीत रिक्षाथांबा हटवण्यात आला. मात्र काही मोजक्या मुजोर रिक्षाचालकांनी या निर्णयाविरूद्ध रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अवघ्या एका तासातच पूर्वीच्याच ठिकाणी रिक्षा लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी समन्वयाची भूमिका बजावणाºया पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. नगराध्यक्षा विजया राऊत, सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी नगरसेवक भोईर यांना सोबत घेऊन चर्चेला सुरूवात केली. मात्र सकाळी झालेला निर्णय पुन्हा कसा बदलू शकतो, असा ठाम पवित्रा घेत भोईर आणि रहिवाशांनी ठिय्या कायम ठेवला. तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षाथांबा हटवल्यानंतर पुन्हा तो तासाभरात कसा येऊ शकतो, असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने स्थानक परिसरात राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली.प्रवाशांना रिक्षातून उतरवले- दरम्यान, याचकाळात शहरात व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांना काही मुजोर रिक्षाचालक वाहतूक बंद करण्यासाठी धाक दाखवत होते. त्यामुळे तीनच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी रिक्षा थांबा हटवण्याच्या आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.- मात्र रिक्षाथांबा पुन्हा आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान, या काळात प्रवासी घेऊन जाणाºया रिक्षाचालकांना अडवून प्रवासी उतरवून देण्याचे प्रकार समोर आले.- यामुळे नागरिक संतापले होते. वाहतूक कोंडी आणि मुजोर रिक्षाचालकांचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच आंदोलन चिघळत असताना तिथे हजर असलेल्या सहायक आयुक्तांनी यावर ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. या विषयावर बोलणे टाळले.

टॅग्स :badlapurबदलापूरnewsबातम्या