शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

बदलापूरमध्ये ८ तास वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:57 IST

महावितरणची सेवा कोलमडली : ग्राहकांमध्ये संताप, कार्यालयाशी संपर्कच नाही

बदलापूर/अंबरनाथ : सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तासभर पाऊस पडल्याने विजेचा खोळंबा होणे ग्राह्य धरले होते. मात्र तासाभराच्या पावसामुळे बदलापूरमधील वीज आठ तास बंद ठेवण्यात आली. पुन्हा एकदा बदलापूरमधील महावितरण विभागाचा कारभार समोर आला आहे. पहिल्या पावसाचा बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली, बेलवली, वालीवली, सोनिवली, बाजारपेठ आणि बदलापूरजवळच्या ग्रामीण भागालाही याचा फटका बसला. यावेळी महावितरण कार्यालयाशी संपर्कहोत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. मंगळवारीही दुरूस्तीच्या कामासाठी दोन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित केला होता.

सोमवारी मान्सूनपूर्व पावसांच्या सरी कोसळल्या. सायंकाळी आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली. तासभर चाललेल्या या पावसामुळे सव्वाआठच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर नऊपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र त्यानंतरही बदलापूर पश्चिम भागातील बहुतांश भाग अंधारात होता. बदलापूर पूर्वेतील वीज पुरवठा काही मिनिटात पूर्वपदावर आला. मात्र बदलापूर पश्चिमेत वीज पुरवठा करणाऱ्या एरंजाड, बाजारपेठ आणि बारवी धरण या फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बेलवली, मांजर्ली, सोनिवली, वालीवली, बाजारपेठ आणि पश्चिमेचा इतर भाग तसेच बारवी धरणापर्यंतचा भाग अंधारात होता.हा खंडित झालेला वीजपुरवठा थेट मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सुरू झाला. परंतु त्यानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे रात्रभर विजेविना नागरिकांची झोपमोड झाली.पहाटे चारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. तोपर्यंत तब्बल आठ तास उलटून गेले होते. मंगळवारीही दुरूस्तीसाठी तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता.बदलापूरप्रमाणे अंबरनाथमध्येही विजेचा खेळ सुरूच होता. सायंकळी गेलेली वीज ही रात्री उशिरा आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. काही भागात रात्री १२ वाजता तर पूर्व भागात पहाटे ३ वाजता पुरवठा सुरळीत झाला. पहिल्या पावसातच महावितरणच्या विभागाच्या कामाचा दर्जा आणि नियोजन उघड झाले.भिवंडीत झाड कोसळून गाडीचे नुकसानशहरात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास वीज गेली. टोरन्टो कंपनीने सोमवारी दुपारी १२ वाजता दुरूस्तीसाठी शहरातील मध्यवर्ती भागातील वीज खंडित केली होती. सायंकाळी ६ वाजता आलेली वीज रात्री पावसामुळे ९ वाजता चार तासांसाठी खंडित केली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मुलांना शाळेचे कपडे व साहित्य घेणाºया पालकांचे हाल झाले. दरम्यान, जैतूनपुरा येथे झाड गाडी व दुचाकीवर कोसळल्याने नुकसान झाले. घुंघटनगरमध्ये विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन धूर निघत होता.पाणी पुरवठ्यालाही बसला फटकाखंडित वीजपुरवठयाचा फटका नागरिकांच्या झोपेसह पाणी पुरवठयालाही बसला. जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा झाला मात्र सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी नेण्यासाठी वीज पुरवठा नसल्याने उशिरा पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांचे वेळापत्रक बिघडले.शेणवा येथे वादळी वारेशेणवा : शहापूर तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. शेणवा, मुसई,खैरे येथील घरांचे नुकसान झाले असून शेणवा येथील पांडुरंग वरकुटे यांनी आदिवासी सोसायटीचून घेतलेल्या कर्जातून घर उभारले होते. वादळी वाºयात त्यांच्या घरांचे पत्र्याचे छप्पर उडाले असून पावसात घरातील तांदूळ, कपडे भुजून खराब झाले. तलाठी पी. विशे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे