शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘साहित्य ते ज्योतिषशास्त्रावर बाबूजींचा ठसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:51 IST

साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रात दिवंगत बाबुराव अर्थात बाबूजी सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.

ठाणे : साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रात दिवंगत बाबुराव अर्थात बाबूजी सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. पत्रकारितेतील सफर, आयुष्यातला संघर्ष आणि आचार्य अत्रेंचे किस्से ऐकावे ते बाबुजींकडूनच, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’ कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार पत्रकार, लेखक तसेच आ. प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव अर्थात ‘बाबूजी’ यांचे ३० नोव्हेंबरला निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी श्रद्धांजली सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. आचार्य अत्रे यांच्या सहवासातील बाबूजींच्या आठवणींना फडणवीस यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रात बाबूजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तोंडपाठ असलेले बाबूजी हे नव्या पिढीसाठी आणि पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.१९६० च्या दशकात बाबूजी आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ दैनिकात होते. संयुक्त महाराष्टÑाची चळवळही त्यांनी जवळून पाहिली. विदर्भातील एका छोट्या गावात जन्मलेला माणूस पुढे मुंबईत कामगार चळवळीत स्वत:ला झोकून देतो. साहित्यातही आपली वेगळी ओळख निर्माण करतो. अशा अनेक पैलूंमुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले, अशा शब्दात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्वातंत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले लढवय्या व्यक्तिमत्व म्हणुन बाबुराव सरनाईक यांची ओळख असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंच्या काळाचा साक्षीदार हरपल्याची भावनाही व्यक्त केली. प्राध्यापक, लेखक प्रदीप ढवळ यांनी बाबूजींच्या व्यक्तिगत जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आपल्याला पुस्तक लिहितांना बाबुजींकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल सांगितले.यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. अनिल देसाई, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, आ. सुनील राऊत, रवींद्र फाटक, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, नरेंद्र मेहता, जितेंद्र आव्हाड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, आयुक्त संजीव जयस्वाल, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती आदी मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांनी या वेळी श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्र म सादर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस