शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मालमत्ता विभागाचा अजब कारभार

By admin | Updated: January 5, 2017 05:37 IST

महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही.

भिवंडी : महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही. अशा स्थितीत मालमत्तेच्या नोंदीची शहानिशा न करता दरवर्षी आॅडिट होत आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेच्या सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद मालमत्ता विभागात होणे अपेक्षित असताना केवळ पालिकेच्या काही इमारतींची नोंद केलेली आहे. शहरातील पालिकेच्या इमारती बांधकाम विभागाकडून बांधल्या जातात. मात्र या इमारतींची मालमत्ता विभागाकडे नोंदच केली जात नाही. काही वर्षापूर्वी एमएमआरडीच्या निधीतून स्वच्छतागृहे बांधण्यात आली. त्यानंतर या वास्तूंचा वापर करण्याच्या निमित्ताने आरोग्य विभागाकडे सोपविणे गरजेचे असताना त्या स्वत:कडे ठेऊन गैरकारभार केला. हा गैरकारभार उघडकीस आल्यानंतर ही स्वच्छतागृहे पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र या वास्तू पालिकेच्या असतानाही त्याची नोंद मालमत्ता विभागाकडे नाही.पालिका आर्थिक संकटात असताना त्यासाठी नगरसेवक वा प्रशासनाने कोणताही ठोस मार्ग न काढता पालिकेची मालमत्ता गहाण ठेवण्याकडे लक्ष वेधले आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र हे करताना मालमत्ता अधिकाऱ्यांचा शेराही घेतलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासांबाबतची नोंद मालमत्ता विभागाकडे होत नाही. (प्रतिनिधी)