शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अविनाश जाधव यांची राजीनामा नाट्यातून माघार; राज यांच्या आदेशानंतर निर्णय घेतल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 05:39 IST

आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या  २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा रविवारी राजीनामा दिला होता. त्याबाबतचे पत्रच त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले होते. मात्र, राज

यांच्या आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या  २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.

२४ तासांत निर्णय मागे

विधानसभा निवडणुकीमध्ये जाधव यांच्यासह सर्वच्या सर्व १२ उमेदवारांना जिल्ह्यात फटका सहन करावा लागला. पालघरमध्येही मनसेचा पराभव झाला.

निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचा आरोप मनसे पालघरचे विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी थेट  राज ठाकरे यांच्याकडे केला होता.

या सर्वच पार्श्वभूमीवर जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. मात्र, या राजीनाम्याला २४ तास उलटत नाहीत तोच त्यांनी तो मागे घेतल्याचेही आता जाहीर केले आहे.

टॅग्स :MNSमनसे