शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली.

जितेंद्र कालेकर - 

ठाणे : मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आता वेगाने करण्यात येत आहे. एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे यांच्यासह तीन डॉक्टरांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (autopsy Doctors inquiry by  Thane ATS alleged murder case)मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्याचवेळी गेल्या १० ते १२ दिवसांपासून काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या एटीएसच्या तपासालाही आता गती यायला सुरुवात झाली आहे. बुधवारी लांडे यांनी एटीएसच्या ठाणे कार्यालयास भेट दिली. त्या वेळी उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या पथकाला या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. या हत्या प्रकरणात येणारे सर्व प्रकारचे बारकावे पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे आदेश त्यांनी दिले. मनसुख यांनी मृत्यूपूर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील तपशील तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचा प्राथमिक अहवाल अशा अनेक बाबींचा नव्याने अभ्यास केला. दरम्यान, मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे, डॉ. राजेश्वर पाटे आणि डॉ. वैभव बारी यांनाही बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर एटीएसच्या ठाणे कार्यालयात पाचारण केले होते. डॉ. घाडगे यांच्या समितीने यापूर्वीच व्हिसेरा प्रिजर्व अ‍ॅण्ड ओपिनियन रिजर्व, असे मत देऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नव्हते. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मनसुख यांच्या फुप्फुसामध्ये काही प्रमाणात खाडीचे पाणी मिळाले होते. एखाद्या हत्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीला आधीच मारले तर फुप्फुसामध्ये पाणी मिळत नाही, असे बोलले जाते. मग, हिरेन प्रकरणात नेमक्या कोणत्या शक्यता असू शकतात? पाण्यात डुंबविण्यात आले की ते बुडाल्यानंतर हे पाणी शरीरात गेले? तसेच तोंडात रुमाल नेमके कशामुळे होते? हे रुमाल काढतेवेळी पंचनामा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंबईच्या सीआययू युनिटचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयासह तिथे आले होते. वाझे तिथे नेमकी कोणत्या कारणासाठी आले होते? अशा अनेक प्रश्नांचे खल एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेत ठाण्यातील बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हरियाणाच्या लॅबचेही मत घेणार एटीएसमनसुख हिरेन यांच्या मृतदेहातील फुफ्फुसामधील पाण्याबाबत शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या पथकात एकमत नाही. त्यामुळे ‘इट इज ओन्ली स्क्रिनिंग’ असे या अहवालात म्हटले आहे. पाणी आहे की नाही हे नेमकी स्पष्ट होत नाही. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून मत घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई एटीएसचे पथक आता हरियाणा येथील न्यायवैद्यक विभागातून याबाबतचे मत मागविणार किंवा तिकडील प्रयोगशाळेत मनसुख यांच्या फुफ्फुसाचा भाग पाठविणार असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिसdoctorडॉक्टरsachin Vazeसचिन वाझेthaneठाणे