शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली.

जितेंद्र कालेकर - 

ठाणे : मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आता वेगाने करण्यात येत आहे. एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे यांच्यासह तीन डॉक्टरांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (autopsy Doctors inquiry by  Thane ATS alleged murder case)मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली. त्याचवेळी गेल्या १० ते १२ दिवसांपासून काहीशा संथ गतीने सुरू असलेल्या एटीएसच्या तपासालाही आता गती यायला सुरुवात झाली आहे. बुधवारी लांडे यांनी एटीएसच्या ठाणे कार्यालयास भेट दिली. त्या वेळी उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या पथकाला या प्रकरणी कसून चौकशीचे आदेश दिले. या हत्या प्रकरणात येणारे सर्व प्रकारचे बारकावे पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे आदेश त्यांनी दिले. मनसुख यांनी मृत्यूपूर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील तपशील तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचा प्राथमिक अहवाल अशा अनेक बाबींचा नव्याने अभ्यास केला. दरम्यान, मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे ठाणे महापालिकेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे, डॉ. राजेश्वर पाटे आणि डॉ. वैभव बारी यांनाही बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर एटीएसच्या ठाणे कार्यालयात पाचारण केले होते. डॉ. घाडगे यांच्या समितीने यापूर्वीच व्हिसेरा प्रिजर्व अ‍ॅण्ड ओपिनियन रिजर्व, असे मत देऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नव्हते. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मनसुख यांच्या फुप्फुसामध्ये काही प्रमाणात खाडीचे पाणी मिळाले होते. एखाद्या हत्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीला आधीच मारले तर फुप्फुसामध्ये पाणी मिळत नाही, असे बोलले जाते. मग, हिरेन प्रकरणात नेमक्या कोणत्या शक्यता असू शकतात? पाण्यात डुंबविण्यात आले की ते बुडाल्यानंतर हे पाणी शरीरात गेले? तसेच तोंडात रुमाल नेमके कशामुळे होते? हे रुमाल काढतेवेळी पंचनामा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंबईच्या सीआययू युनिटचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयासह तिथे आले होते. वाझे तिथे नेमकी कोणत्या कारणासाठी आले होते? अशा अनेक प्रश्नांचे खल एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेत ठाण्यातील बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हरियाणाच्या लॅबचेही मत घेणार एटीएसमनसुख हिरेन यांच्या मृतदेहातील फुफ्फुसामधील पाण्याबाबत शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या पथकात एकमत नाही. त्यामुळे ‘इट इज ओन्ली स्क्रिनिंग’ असे या अहवालात म्हटले आहे. पाणी आहे की नाही हे नेमकी स्पष्ट होत नाही. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून मत घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई एटीएसचे पथक आता हरियाणा येथील न्यायवैद्यक विभागातून याबाबतचे मत मागविणार किंवा तिकडील प्रयोगशाळेत मनसुख यांच्या फुफ्फुसाचा भाग पाठविणार असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिसdoctorडॉक्टरsachin Vazeसचिन वाझेthaneठाणे