शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल - गौरव जोशी 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 2, 2023 15:53 IST

आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले.

ठाणे : जवळपास ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी, समीक्षक कायम लक्षात ठेवतील असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियास्थित क्रिकेट समीक्षक, समालोचक गौरव जोशी यांनी केले. 

आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले. कोरोना कालखंडात झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक पैलूंवर गौरव जोशींनी यावेळी प्रकाश टाकला. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळीस सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या नावांची ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांत दखल घेतली जायची. पण सुरुवातीच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ करत कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे यापुढे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अजिंक्य रहाणेच्या त्या भारतीय संघाचा कायम उल्लेख होत राहील.

या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियातील प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या कोरोना विलनीकरणाच्या नियमांमुळे वैतागलेले भारतीय खेळाडू, त्यात पहिल्या कसोटीतील लाजीरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची उडवलेली त्रेधातिरपीट या पार्श्वभूमीवर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचे उंचावलेले मनोधैर्य, त्यानंतर खेळाडूंची उंचावलेली कामगिरीचे गौरव जोशी यांनी रसाळ शैलीत विश्लेषण केले. क्रिकेटप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या टॉक शोची प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने आणखी रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंद भारती समाजाचे अध्यक्ष सुभाष मोरेकर यांनी गौरव जोशी यांचे स्वागत तर कार्यवाह विवेक मोरेकर यांनी जोशी यांचा परिचय उपस्थितींना करून दिला. 

टॅग्स :Ajinkya Rahaneअजिंक्य रहाणेIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघAustraliaआॅस्ट्रेलिया