शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

कर्जबाजारीपणाला कंटाळून औरंगाबादच्या व्यावसायिकाची ठाण्यात आत्महत्या; खाडीत सापडला मृतदेह

By जितेंद्र कालेकर | Updated: October 23, 2022 20:30 IST

कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली.

ठाणे : वाहन खरेदी - विक्रीच्या व्यवसायात आलेले अपयश तसेच कर्जाऊ आणि उधारीवर घेतलेली २० ते २५ लाखांची रक्कम परत करता येत नसल्याच्या तणावातून औरंगाबादच्या सचिन पद्माकर आहेर (४६) या व्यावसायिकाने ठाण्यातील खाडीत आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

कळवा खाडीत नवीन ब्रिजजवळ, जय भीमनगर कळवा पश्चिम येथे खाडीतील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना २२ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मिळाली. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह अग्निशमन दलाने हा मृतदेह खाडीतून पोलिसांच्या उपस्थितीत पाण्यातून बाहेर काढला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिरसाठ आणि उपनिरीक्षक पोतेकर यांच्या पथकाने या मृतदेहाची घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा त्याच्या गालावर खरचटलेल्या व्यतिरिक्त कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. हा मृतदेह पाण्यात भिजल्यामुळे त्याच्या शरीराचा बराच भाग सडलेला होता. त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधार आणि पॅन कार्डच्या आधारे त्याचे नाव सचिन पद्माकर आहेर (रा. लक्ष्मीनगर, वैजापूर, औरंगाबाद) असे असल्याची माहिती समोर आली. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. त्याच्या मागे पत्नी, वडील, १७ आणि १३ वर्षांची दोन मुले असा परिवार आहे.

सहा महिन्यांपासून वाशीत वास्तव्य -औरंगाबादच्या वैजापूर येथे वास्तव्यास असलेला सचिन सहा महिन्यांपासून नवी मुंबईतील वाशीत राहात होता. जुन्या मोटार कार खरेदी - विक्रीचा त्याचा व्यवसाय होता. औरंगाबादमध्ये त्याला या व्यवसायात तोटा आला होता. यातून तो कर्जबाजारी झाला. तो सहा महिन्यांपासून वाशीत मित्रांसोबत वास्तव्य करीत होता. त्याच्यावर २० ते २५ लाखांचे कर्ज होते. त्यामुळेच त्याला उधार आणि कर्जाऊ पैसे देणाऱ्यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता, अशी माहिती त्याची पत्नी आणि वडिलांनी पोलिसांना दिली. वैफल्यग्रस्त असल्यामुळे त्याने वाशीतील खाडीत स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :MumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस