शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वृक्षलागवडीचे आॅडिट करा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:35 IST

श्रीकांत शिंदे यांची मागणी : मांगरूळ डोंगरावरील झाडे खाक, अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

अंबरनाथ : राज्यात सरकारकडून वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, वृक्षलागवड केल्यावर त्याचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग कमी पडत आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मांगरूळ येथे लावलेल्या एक लाख वृक्षांच्या डोंगरावरच वणवा लागून वृक्ष पेटवण्यात आले. सलग दोन वर्षे हा प्रकार घडल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनविभागाच्या कारभारावर शंका व्यक्त केली आहे. अंबरनाथ तालुक्यात ज्याप्रकारे घटना घडली आहे, तशाच घटना राज्यात इतरत्रही घडल्या असतील. त्यामुळे राज्यातील १३ कोटी वृक्षलागवडीचे आॅडिट करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. १५ हजार नागरिकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी वृक्षलागवड केली होती. मात्र, सलग दोन वर्षे ज्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले, त्याचठिकाणी वणवा लागून झाडे पेटवण्यात आली. बुधवारी रात्री हा प्रकार घडल्यावर गुरुवारी दुपारीदेखील त्या घटनेची पुनरावृत्ती घडली. या वणव्यात आठ हजारांहून अधिक वृक्षांना झळ बसली आहे. या वृक्षांची पाहणी करण्यासाठी खासदार शिंदे हे शुक्रवारी मांगरूळला आले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी केल्यावर आपला संताप वनविभागाच्या अधिकाºयांवर व्यक्त केला. वनविभागाने योग्य नियोजन न केल्याने आणि सुकलेले गवत न कापल्याने हा वणवा लावण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी राज्यातील वनविभागाच्या धोरणावरच शंका व्यक्त केली आहे. राज्यात १३ कोटी वृक्षलागवड केल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात त्यातील किती वृक्ष जिवंत आहेत, याची पाहणी करणे गरजेचे आहे. वृक्षलागवड करून ध्येयपूर्ती होत नाही, तर त्यासाठी त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे.नव्याने वृक्षलागवडच्दुसरीकडे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी या वृक्षांची पाहणी केल्यावर जे वृक्ष पूर्ण जळाले आहे, त्याठिकाणी नवीन वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तर, जे जिवंत आहेत, त्यांना पाणी देऊन पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.च्अंबरनाथमध्ये वनविभागाने या ध्येयालाच बगल दिल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात जी वृक्षलागवड करण्यात आली आहे, त्या वृक्षांचे आॅडिट करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे