शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा पहिला खून - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:46 IST

ज्या महाराष्ट्रात आपण संस्कारक्षम राजकारण बघितले आहे, त्याच ठिकाणी असे होणार असेल तर यापुढील राजकारण कसे असेल हे सांगताच येत नाही : जितेंद्र आव्हाड

ठाणे  : "न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे वाटले. न्यायव्यवस्थेचा जयजयकार केला. मात्र आज जे काही घडले, कसे घडले, यावर मला बोलायचे नाही. परंतु ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या वैयक्तिक घरावर ज्या घरात त्यांच्या पत्नी राहतात, नात राहते त्या घरात अचानक घुसणे हा लोकशाहीचा महाराष्ट्रातील पहिला खून आहे," अशी टीका राज्याचे गृहनिर्मामंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आजर्पयत असे कधीही घडलेले नाही. गोपीनाथ मुंढे यांनी १९९३ साली शरद पवार यांच्यावर शाब्दीक टीका केली. मात्र त्यावेळेस याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील हा विचार मनात ठेवून शरद पवार यांनी रात्री २ वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंढे यांची सुरक्षा दुप्पट केली. महाराष्ट्राच्या राजकारणाला सोनेरी झालरच ही वेगळी आहे. एकमेकांवर टीका करुनही दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनाचा सन्मान करायचा, हे महाराष्ट्राने कायम अनुभवले आहे," असे आव्हाड म्हणाले. 

प्रल्हाद केशव अत्रेंनी यशंवत रावांवर टीका करणो आणि यशवंत रावांनी अत्रे यांना त्यांची टीका कशी चुकीची आहे, ह समजवणे, त्यानंतर अत्रे यांनी परत यशवंत रावांवर न बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु ही काय पद्धत आहे का असं म्हणत यामुळे राज्याचे राजकारण बिघडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. "ज्या महाराष्ट्रात आपण संस्कारक्षम राजकारण बघितले आहे, त्याच ठिकाणी असे होणार असेल तर यापुढील राजकारण कसे असेल हे सांगताच येत नाही. याच्या मागे राजकीय शक्ती आहे की नाही, हा प्रश्न नाही. परंतु हे जे कोणी घडवून आणले असेल त्याला काय वाटते तो सुरक्षित आहे? जेव्हा तुम्ही हे सर्व करता, तेव्हा लक्षात ठेवा तलवाराच्या ताकदीवर जगणारे हे तलवारीनेच मरतात अशी एक म्हण आहे," असेही त्यांनी सांगितले.

"...तुम्ही लोकांची मनं जिंकू शकत नाही""असे कोणाच्या घरावर हल्ले करुन तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही, त्याचा लोकांना किळस वाटायला लागला आहे. ८२ वर्षाचे पवार हे घरात असते तर ते या आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले असते," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. "त्यांची मुलगी आदोलकांना सामोरी गेली, त्यांच्या रक्तात पवार यांचेच रक्त आहे, परंतु त्यांनाही धक्काबुक्की करता, हे चुकीचे असून याचा मी धिक्कार करतो," असेही आव्हाड यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक माणूस याचा धिक्कार करले असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

"एकीकडे जयजयकार करता आणि..."एकीकडे जयजयकार करता आणि दुसरीकडे पवार यांच्या घरावर हल्ला करता, त्यामुळे असेही समजू नका, समोरच्याने बांगड्या घातल्या आहेत. परंतु आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो, जिल्ह्या जिल्ह्यात हा पक्ष असून प्रत्येक ठिकाणी आमची ताकद आहे. परंतु आम्ही लोकशाहाची सन्मान करणारे असल्याने आम्ही असे काही करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु तुम्ही जर आमच्या नेत्याच्या घरार्पयत जाणार असाल तर आम्ही त्याचा निषधे करतो. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक याचा निषेध करत आहे. आम्ही शांततेचा मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

"ज्या एसटी कर्मचा:यांनी हे केले, त्यांनी इतिहास तपासावा, पाच - पाच युनियनचे अघोषित नेते शरद पवार हे गेले पाच दशके नेते आहेत. जुन्या एसटी कर्मचाऱ्यांना विचारुन बघा," असा सल्लाही आव्हाड दिला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार