शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासनाच्या आश्वासनानंतर पंडित यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:20 IST

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आदिवासींना शिधापत्रिका देणे, रोजगार व जीवनावश्यक वस्तू देणेबाबत संबंधित विभागांना सकारात्मक कार्यवाहीसाठीचे निर्देश राज्य शासनाने दिल्याचे पत्रात नमूद आहे. 

मीरारोड - वंचित आदिवासींना अंत्योदय योजना आणि प्राधान्यक्रमाने शिधावाटप पत्रिका देऊन धान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू देण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळपासून सुरू केलेले बेमुदत अन्नत्यागाचे आंदोलन सोमवारी सायंकाळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.

उच्च न्यायालयात हमीपत्र देऊन देखील वंचित आदिवासींना अंत्योदय योजना आणि प्राधान्यक्रमाने शिधावाटप पत्रिका देऊन धान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू सरकारकडून दिल्या जात नसल्याने पंडित यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्युल्लता, संघटनेचे रामभाऊ वारणा या तिन्ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून वरसावे नाका येथील ठाण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.  

सोमवारी सायंकाळी शासनाचे उपसचिव ल. गो. ढोके यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर पंडित यांनी हॉटेल व्यावसायिक तलाह मुखी यांच्या हस्ते पेय घेऊन मरण उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आदिवासींना शिधापत्रिका देणे, रोजगार व जीवनावश्यक वस्तू देणेबाबत संबंधित विभागांना सकारात्मक कार्यवाहीसाठीचे निर्देश राज्य शासनाने दिल्याचे पत्रात नमूद आहे. दरम्यान पालघर आदी जिल्हाधिकाऱ्यांना देखील शिधापत्रिका देण्याचे निर्देश शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. अतिरिक्त इष्टांकाची मागणी शासनाकडे तात्काळ करावी असे कळवण्यात आले आहेत. 

टॅग्स :mira roadमीरा रोड