शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:47 IST

अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ  - अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाने नगराळे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी मतदारसंघाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व हे पूर्वीपासून होते. मात्र वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड सर्वांची होती. त्यातच गेल्यावेळेस दिलेल्या उमेदवाराबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवार आत्ताच निश्चित करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गेल्या निवडणुकीचा अहवाल पाहता राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते ही काँग्रेसने मिळवलेली आहेत. त्यामुळे पुढील विधानसभेच्या निवडणुकीत अंबरनाथची जागा ही काँग्रेससाठीच मागायची असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण ताकद देण्यासाठी पक्षाने देखील योग्य सहकार्य करावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या आढावा बैठकीनंतर नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने मतदारसंघांची चाचपणी सुरू केल्याचे मान्य केले. पक्षाला अपेक्षित असलेली सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. अंबरनाथमधील पदाधिकाºयांशी चर्चा केल्यावर कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी तयार आहेत. ही जागा काँग्रेस लढवणार हे निश्चित असले तरी आघाडी करण्याची वेळ आली तर त्यावेळेस मागील निवडणुकीचा आकडा पाहून ही जागा काँग्रेसकडे कशी राहिल या संदर्भात अहवाल पाठवला जाणार आहे.काम केल्यास परिवर्तन घडेलअंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कॅप्टन निलेश पेंढारी, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून हे काम तळागळापर्यंत कसे पोहचवता येईल यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राला उल्हासनगर महानगरपालिकेतील २२ प्रभाग जोडण्यात आले असून त्या भागातही काँग्रेस आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांन सांगितले. या मतदारसंघात योग्य प्रकारे काम केल्यास या ठिकाणी परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस