शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:47 IST

अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ  - अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. काँग्रेसचे निरीक्षक भा. ई. नगराळे यांनी सोमवारी अंबरनाथमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघाची माहिती घेतली. तसेच हा मतदारसंघ लढवण्याबाबत सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाने नगराळे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी मतदारसंघाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व हे पूर्वीपासून होते. मात्र वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची ओरड सर्वांची होती. त्यातच गेल्यावेळेस दिलेल्या उमेदवाराबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवार आत्ताच निश्चित करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गेल्या निवडणुकीचा अहवाल पाहता राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते ही काँग्रेसने मिळवलेली आहेत. त्यामुळे पुढील विधानसभेच्या निवडणुकीत अंबरनाथची जागा ही काँग्रेससाठीच मागायची असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला पूर्ण ताकद देण्यासाठी पक्षाने देखील योग्य सहकार्य करावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या आढावा बैठकीनंतर नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने मतदारसंघांची चाचपणी सुरू केल्याचे मान्य केले. पक्षाला अपेक्षित असलेली सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. अंबरनाथमधील पदाधिकाºयांशी चर्चा केल्यावर कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी तयार आहेत. ही जागा काँग्रेस लढवणार हे निश्चित असले तरी आघाडी करण्याची वेळ आली तर त्यावेळेस मागील निवडणुकीचा आकडा पाहून ही जागा काँग्रेसकडे कशी राहिल या संदर्भात अहवाल पाठवला जाणार आहे.काम केल्यास परिवर्तन घडेलअंबरनाथ विधानसभा मतदारसंघात कॅप्टन निलेश पेंढारी, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून हे काम तळागळापर्यंत कसे पोहचवता येईल यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राला उल्हासनगर महानगरपालिकेतील २२ प्रभाग जोडण्यात आले असून त्या भागातही काँग्रेस आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांन सांगितले. या मतदारसंघात योग्य प्रकारे काम केल्यास या ठिकाणी परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस