शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काल्हेर ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्ती कामांना अखेर सुरुवात

By नितीन पंडित | Updated: June 24, 2023 16:18 IST

माजी उपसरपंच सुमित म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी: काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीस व डांबरीकरण कामास अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबई मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही सुमित म्हात्रे यांना देत दिवाळी ननंतर या रस्त्याचे कंक्रेटीकरणं करण्यात येईल असे आश्वासन दिले होते

अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे गुंदवली,मानकोली,ताडाळी,कामतघर,वळ,पूर्णा,दापोडेया गावांसह काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुर फाटा काल्हेर ठाणे मार्गावरून प्रवास करताना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नागरिक काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याचा वापर करतात. मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या पाईपलाईनच्या मार्गावर प्रचंड खड्डे पडले होते या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपायुक्त विशेष अभियांत्रिकी चक्रधर कांडलकर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माळवदे, उप जलअभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सुमित म्हात्रे यांनी काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

काल्हेर ते ताडाळी मार्गिकेतील या ५.६ कि.मी. रस्त्याचे १२ इंच मापाप्रमाणे कॉंक्रीटीकरण करणे, रस्त्याचे संवर्धनाच्या दृष्टीने वाहतुकीसाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देणे, रस्त्यादरम्यान असणारे पूल व मोर्‍या अतिशय कमकुवत झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करणे यासंदर्भात चर्चा व लेखी मागणी करण्यात आली होती.म्हात्रे यांच्या मागण्यांची दखल घेत अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.