शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

काल्हेर ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्ती कामांना अखेर सुरुवात

By नितीन पंडित | Updated: June 24, 2023 16:18 IST

माजी उपसरपंच सुमित म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी: काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीस व डांबरीकरण कामास अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबई मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल अशी ग्वाही सुमित म्हात्रे यांना देत दिवाळी ननंतर या रस्त्याचे कंक्रेटीकरणं करण्यात येईल असे आश्वासन दिले होते

अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे गुंदवली,मानकोली,ताडाळी,कामतघर,वळ,पूर्णा,दापोडेया गावांसह काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंजुर फाटा काल्हेर ठाणे मार्गावरून प्रवास करताना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नागरिक काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याचा वापर करतात. मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या पाईपलाईनच्या मार्गावर प्रचंड खड्डे पडले होते या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपायुक्त विशेष अभियांत्रिकी चक्रधर कांडलकर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माळवदे, उप जलअभियंता व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सुमित म्हात्रे यांनी काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

काल्हेर ते ताडाळी मार्गिकेतील या ५.६ कि.मी. रस्त्याचे १२ इंच मापाप्रमाणे कॉंक्रीटीकरण करणे, रस्त्याचे संवर्धनाच्या दृष्टीने वाहतुकीसाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देणे, रस्त्यादरम्यान असणारे पूल व मोर्‍या अतिशय कमकुवत झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करणे यासंदर्भात चर्चा व लेखी मागणी करण्यात आली होती.म्हात्रे यांच्या मागण्यांची दखल घेत अखेर मुंबई महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.